दक्षिणेकडील गंगा असलेली ‘गोदावरी’ पानवेलीच्या विळख्यात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

या पानवेली लवकरात लवकर काढाव्या, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (Nashik Godavari River Pollution People health in problem)

दक्षिणेकडील गंगा असलेली 'गोदावरी' पानवेलीच्या विळख्यात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Nashik Godavari River Pollution 1
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 12:53 PM

नाशिक : देशभरात नदी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदी ही पानवेलीच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला आहे. या पानवेलीमुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या सहा ते सात गावांना पूर पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या पानवेली लवकरात लवकर काढाव्या, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (Nashik Godavari River Pollution People health in problem)

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राज्यात मान्सून दाखल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्रंबकेश्वर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाचे पाणी गोदावरी नदीच्या प्रवाहातून निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणात दाखल होते. नांदूर मधमेश्वर धरणाच्या बॅक वॉटरला चांदोरी, सायखेडा ही गाव आहेत. या गावांच्या परिसरात गोदावरी नदीत नाशिक भागातून सोडण्यात आलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पानवेली वाहून आल्या आहे. इतकंच नव्हे तर अनेक कंपन्यांमधील केमिकल युक्त दूषित पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी असलेले जलचर प्राणी आणि त्यावर असलेले पाणी योजनेतील लाभार्थी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

….अन्यथा आंदोलन करु

दरम्यान इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास या पानवेली सायखेडा येथील पुलाला अडकतील. त्यामुळे पाण्याचा फुगवठा निर्माण झाला तर संपूर्ण पाणी हे चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावातून वाहत जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच पूर पाण्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे या पानवेली वेळेवर काढाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जर या पानवेली न काढल्यास आंदोलन करु, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

गोदावरी नदीतील पानवेलीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने गोदावरी नदी मोकळा श्वास कधी घेणार? नागरिकांच्या समस्या कधी मिटणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

(Nashik Godavari River Pollution People health in problem)

संबंधित बातम्या : 

सर्व्हे : कृष्णा सहकारी साखर कारख्यान्याच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?

Knowledge | चित्राप्रमाणे सुंदर दिसणारं, पाण्यावर वसलेलं शहर ‘व्हेनिस’, जाणून घ्या का आणि कसं वसवलं?

“ये आम हैं कुछ खास”, 7 आंब्यांच्या सुरक्षेसाठी 4 गार्ड, 6 भनायक श्वान, जाणून घ्या यामागील कारण

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.