‘नासाका’चे बॉयलर पेटणार, खासदार पुत्र गोडसेंकडे सारथ्य जायची शक्यता

गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तंगीमुळे बंद पडलेल्या नाशिक (Nashik) सहकारी साखर कारखान्याचे (NASAKA) बॉयलर यंदा पेटणार आहे. हा कारखाना खासदार हेमंद गोडसे (MP Hemant Godse) यांच्या पुत्राकडे चालवायला येण्याची शक्यता आहे.

'नासाका'चे बॉयलर पेटणार, खासदार पुत्र गोडसेंकडे सारथ्य जायची शक्यता
नाशिक (Nashik) सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर यंदा पेटणार आहे.
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 4:25 PM

नाशिकः गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तंगीमुळे बंद पडलेल्या नाशिक (Nashik) सहकारी साखर कारखान्याचे (NASAKA) बॉयलर यंदा पेटणार आहे. हा कारखाना खासदार हेमंद गोडसे (MP Hemant Godse) यांच्या पुत्राकडे चालवायला येण्याची शक्यता आहे. (Nashik Government Sugar Factory to be started, MP Hemant Godse’s son Ashtalakshmi Infrastructure Company submitted tender)

नाशिक सहकारी साखर कारखान्याची तब्बल 1200 मेट्रीक टन गाळप क्षमता आहे. या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जवळपास 17 हजार सभासद आहेत. हा कारखाना बंद असल्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. तसेच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन हा साखर कारखाना सुरू करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. खासदार हेमंत गोडसे यांच्या मुलाच्या अष्टलक्ष्मी इन्फ्रास्टक्चर कंपनीने ‘नासाका’ चालविण्यास तयारी दर्शवली आहे. तशी निविदाही त्यांनी दाखल केली आहे. आता ही निविदा शासनाकडे पाठवण्यात आली आहे. सहकार विभागाने या निविदेला हिरवा कंदील दिला, तर हजारो जणांना रोजगार मिळणार असून, शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्नही मिटणार आहे.

यापूर्वीही झाले प्रयत्न

कारखाना चालविण्यास घेण्यासाठी यापूर्वी बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे व आमदार सरोज आहिरे यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांची सहकारमंत्र्यांसह साखर आयुक्तांसमवेत बैठकही झाली होती. त्यानंतर ९ जुलै २०२१ रोजी बाजार समिती व ‘नासाका’चे सभासद यांच्यासोबत ऑनलाइन सभा घेऊन चर्चा करण्यात आली. दोन ठराव केले गेले. एक प्रस्ताव प्रस्ताव सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधकांना पाठवला. त्यांनी पणन संचालकांकडे व संचालकांनी शासनाकडे पाठवला. मात्र, शासनाने बाजार समितीला हा कारखाना चालवायला परवानगी दिली नाही.

काढला होता विक्रीस

नाशिक सहकारी साखर कारखाना काही दिवसांपूर्वी विक्रीस काढण्यात आला होता. त्यासाटी नाशिक जिल्हा बँकेने पुढाकार घेतला होता. बँकेने कारखान्याचे सुमारे १३७ कोटी रुपयांचे मूल्य काढले होते. त्यानंतर साखर आयुक्तांकडे ‘नासाका’ विक्रीची परवानगी मागितली होती. मात्र, माजी खासदार देविदास पिंगळे आणि आमदार सरोज अहिरे यांनी पणन व सहकारमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. सोबतच शासनाकडेही जोर लावला. या प्रयत्नांमुळेच या कारखान्याची विक्री होता होता राहिली आहे. (Nashik Government Sugar Factory to be started, MP Hemant Godse’s son Ashtalakshmi Infrastructure Company submitted tender)

इतर बातम्याः

नाशिकमधल्या 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा; धरणांवर गेल्यास फौजदारी

महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश

ओ मेरे सोना रे सोना रे सोना…नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने 46900 वर!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.