AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधल्या 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा; धरणांवर गेल्यास फौजदारी

गेल्या आठवड्याभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा (water storage) झाला आहे. त्यामुळे गंगापूर, दारणासह 11 धरणांवर जमावबंदी (Congestion order) आदेश लागू करण्यात आला आहे.

नाशिकमधल्या 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा; धरणांवर गेल्यास फौजदारी
पावसाने धरणे भरली.
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 3:39 PM
Share

नाशिकः गेल्या आठवड्याभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा (water storage) झाला आहे. त्यामुळे गंगापूर, दारणासह 11 धरणांवर जमावबंदी (Congestion order) आदेश लागू करण्यात आला आहे. (78% water storage in 24 dams in Nashik, Congestion order on 11 dams including Gangapur, Darna dams)

नाशिक शहराची तहान गंगापूर धरण भागवते. या धरण समूहाचा पाणीसाठा 95 टक्क्यांवर गेला आहे. दारणा धरणाचा साठा 87 टक्के झाला आहे. वरुणराजाच्या कृपेने जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. पावसाळ्यात सलामीलाच नाशिककडे वक्रदृष्टी करणाऱ्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला यावर्षीचा पहिला पूर आला. मनमाड, नांदगावलाही पावसाने झोडपून काढले. वालदेवीसह अनेक नद्यांना पूर आला. मुंबईला पाणीपुरवठा करणारे अप्पर वैतरणा धरणही भरले. गंगापूर, दारणा, नांदूरमधमेश्वरसह जिल्ह्यातल्या प्रमुख 12 धरणांमधून विसर्ग सुरू होता. आताही सहा धरणांमधून हा विसर्ग सुरू आहे. मात्र, तूर्तास पावसाचा जोर कमी झाल्याने मंगळवारपासून या विसर्गात कपात करण्यात आली आहे. गंगापूर धरणातून 1659 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग आता 553 वर आणण्यात आला आहे. दारणा, कडवा, आळंदी, वालदेवी या धरणातील विसर्गातही कपात करण्यात आली आहे.

ही धरणे काठोकाठ भरली नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.

जळगावलाही दिलासा जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, बोरी ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचा साठा हा 60.84 वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाणीचिंता मिटली आहे.

मुंबईचा पाणीप्रश्न मिटला

मुंबईकला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला. मंगळवारी धरणाच्या तीन सांडव्याचे एक गेट उचलून 1865 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोबतच कालव्याद्वारे 450 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे.

इतर बातम्याः

महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश

नाशिकमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचे थैमान; रुग्णांची संख्या तेराशेंच्या घरात

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.