AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधल्या 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा; धरणांवर गेल्यास फौजदारी

गेल्या आठवड्याभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा (water storage) झाला आहे. त्यामुळे गंगापूर, दारणासह 11 धरणांवर जमावबंदी (Congestion order) आदेश लागू करण्यात आला आहे.

नाशिकमधल्या 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा; धरणांवर गेल्यास फौजदारी
पावसाने धरणे भरली.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Sep 16, 2021 | 3:39 PM
Share

नाशिकः गेल्या आठवड्याभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा (water storage) झाला आहे. त्यामुळे गंगापूर, दारणासह 11 धरणांवर जमावबंदी (Congestion order) आदेश लागू करण्यात आला आहे. (78% water storage in 24 dams in Nashik, Congestion order on 11 dams including Gangapur, Darna dams)

नाशिक शहराची तहान गंगापूर धरण भागवते. या धरण समूहाचा पाणीसाठा 95 टक्क्यांवर गेला आहे. दारणा धरणाचा साठा 87 टक्के झाला आहे. वरुणराजाच्या कृपेने जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. पावसाळ्यात सलामीलाच नाशिककडे वक्रदृष्टी करणाऱ्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला यावर्षीचा पहिला पूर आला. मनमाड, नांदगावलाही पावसाने झोडपून काढले. वालदेवीसह अनेक नद्यांना पूर आला. मुंबईला पाणीपुरवठा करणारे अप्पर वैतरणा धरणही भरले. गंगापूर, दारणा, नांदूरमधमेश्वरसह जिल्ह्यातल्या प्रमुख 12 धरणांमधून विसर्ग सुरू होता. आताही सहा धरणांमधून हा विसर्ग सुरू आहे. मात्र, तूर्तास पावसाचा जोर कमी झाल्याने मंगळवारपासून या विसर्गात कपात करण्यात आली आहे. गंगापूर धरणातून 1659 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग आता 553 वर आणण्यात आला आहे. दारणा, कडवा, आळंदी, वालदेवी या धरणातील विसर्गातही कपात करण्यात आली आहे.

ही धरणे काठोकाठ भरली नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.

जळगावलाही दिलासा जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, बोरी ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचा साठा हा 60.84 वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाणीचिंता मिटली आहे.

मुंबईचा पाणीप्रश्न मिटला

मुंबईकला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला. मंगळवारी धरणाच्या तीन सांडव्याचे एक गेट उचलून 1865 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोबतच कालव्याद्वारे 450 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे.

इतर बातम्याः

महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश

नाशिकमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचे थैमान; रुग्णांची संख्या तेराशेंच्या घरात

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...