AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लासलगांव पाठोपाठ येवला बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय, 70 वर्षांची प्रथा बंद, अमावस्येला लिलाव सुरु

अमावस्येच्या दिवशी लासलगाव नंतर आता येवल्यात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याची परंपरा मोडकळीस काढा असे आदेश राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते.

लासलगांव पाठोपाठ येवला बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय, 70 वर्षांची प्रथा बंद, अमावस्येला लिलाव सुरु
येवला बाजार समितीत अमावस्येला लिलाव सुरु
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 2:05 PM
Share

नाशिक (येवला): आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नंतर आता येवला बाजार समितीनेही अंधश्रद्धेचा कळस उतरवला आहे. अमावस्येच्या दिवशी लासलगाव नंतर आता येवल्यात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याची परंपरा मोडकळीस काढा असे आदेश राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार यांनी या आदेशाची तातडीने अमलबजावणी केल्याने आज प्रथमच 70 वर्षानंतर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव सुरु झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले

70 वर्षांची पंरपरेला मुठमाती

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. सन -1952 मध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली 1955 मध्ये कामकाजाला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत 70 वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याला कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याची ही परंपरा बंद करा असे आदेश मंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर आले असताना दिले होते.

सोमवती अमावस्येला लिलाव सुरु

आज पोळा आणि श्रावण महिन्याची आमवस्या असल्याने या परंपरेला फाटा देत आज अमावस्येच्या दिवशी येवला बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद देत आपल्या 250 वाहनातील 5 हजार क्विंटल कांदा आवक विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला कमाल 1670 रुपये ,किमान 500 रुपये तर सर्वसाधारण 1400 रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. दर महिन्याच्या अमावस्याला कांदा आणि धान्य लिलाव सुरु केल्याने आता शेतकर्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, असं येवला बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी वसंत पवार आणि शेतकरी विष्णू चव्हाण यांनी सांगितलं आहे.

लासलगाव बाजारसमितीकडून 75 वर्षांच्या परंपरेला फाटा

कांदा म्हटले की चटकन तोंडात नाव लासलगावचे येते. मग ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत असो लासलगावची चर्चा होतं असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आल्या. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत 75 वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याला कांदा व धान्याचे लिलाव बंद ठेवणे होय. मात्र, जून महिन्यातील अमावस्येपासून लिलाव सुरु करण्यात आले आहेत.

इतर बातम्या

TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती

Onion Price Today: शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजार समिती सुरु

Nashik Yeola APMC stop seventy years old tradition to close auction on Amavasya of each month today

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.