AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Vs MNS: राष्ट्रगीत न येणारेही हनुमान चालीसा म्हणायला निघालेत, संजय राऊतांचा राज ठाकरेंसह राणांनाही टोला

खासदार संजय राऊत म्हणाले की, नाशिक शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी अयोध्येचा कार्यक्रम आखला होता. आम्ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जाणार अयोध्येला जाणार आहोत. शरयू नदीवर हा कार्यक्रम होईल. हा संपूर्ण देशाचा कार्यक्रम आहे.

Sanjay Raut Vs MNS: राष्ट्रगीत न येणारेही हनुमान चालीसा म्हणायला निघालेत, संजय राऊतांचा राज ठाकरेंसह राणांनाही टोला
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 3:01 PM
Share

नाशिकः राष्ट्रगीत म्हणता न येणारेही आता हनुमान चालीसा म्हणायला निघालेत, असे म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि खासदार नवनीत राणा यांना जोरदार टोला लगावला. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी सरकारविरोधात किंवा आमच्या विरोधात बोलतात त्यांना झेड सुरक्षा देतील. डबल झेड सुरक्षा देतील. मात्र, इथे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या जीविताला धोका नाही. तसा असेल, तर महाराष्ट्रातील पोलीस दल अतिशय सक्षम आहे. याची माहिती केंद्राला आहे, पण तरीही केंद्र सरकार महाविकास आघाडीवर बेछूट आरोप करत आहे. असे करून केंद्राचा पैसा उडवत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे, हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत. संजय राऊत कालपासून नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सकाळी काळाराम मंदिरात जात आरती केली. त्यानंतर दुपारी पत्रकार परिषद घेत भाजप, मनसेवर आरोपाच्या जोरदार फैरी झाडल्या.

शिवसेनेचा अयोध्या कार्यक्रम

खासदार संजय राऊत म्हणाले की, नाशिक शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी अयोध्येचा कार्यक्रम आखला होता. आम्ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जाणार अयोध्येला जाणार आहोत. शरयू नदीवर हा कार्यक्रम होईल. हा संपूर्ण देशाचा कार्यक्रम आहे. आम्ही फार पूर्वीपासून अयोध्येला जातो. बाबरी पाडण्यापूर्वीपासून. ते आता राम मंदिराचा कळस उभा करण्यापर्यंत. आम्ही निर्मळ मनाने तिथे जातो. तुम्ही त्या ठिकाणी निर्मळ भावनाने या, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय महाराष्ट्रासह इतर दंगली घडवून राष्ट्रपती राजवट राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मनी वसे ते स्वप्नी दिसे

संजय राऊत यांच्या आरोपाचा आज मुंबईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला. दरेकर म्हणाले की, राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती आताच निर्माण झालेली आहे. कारण मंत्री जेलमध्ये आहेत. शेतकरी, एसटी कर्मचारी, वीज प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र, आमचा तसा डाव असता, तर आम्ही या पूर्वीच राष्ट्रपती राजवट लावली असती. राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती निर्माण झाली, तर केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावत असते, पण पक्षीय द्वेषातून आणि सूड भावनेतून राष्ट्रपती राजवट लागत नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.