AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट : पाण्यासाठीचा वनवास संपला, इगतपुरीच्या आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचलं पाणी

पाणी हे जीवन आहे. एकवेळ माणूस अन्न नाही मिळालं म्हणून उपाशी राहू शकतो. पण पाणी नाही मिळालं तर माणूस जगू शकणार नाही. त्यामुळे पाण्याला जास्त महत्त्व आहे. इगतपुरीतल्या आदिवासी महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. पण त्यांच्या या संघर्षाची जाणीव मनसेच्या पाणीदुताला झाली आणि त्यांनी या आदिवासी पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्धार केला आहे.

टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट : पाण्यासाठीचा वनवास संपला, इगतपुरीच्या आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचलं पाणी
टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट : पाण्यासाठीचा वनवास संपला, इगतपुरीच्या आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचलं पाणी
| Updated on: Apr 14, 2024 | 3:48 PM
Share

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय. पण काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा फार वणवा आहे. एकीकडे प्रचंड कडाक्याचं ऊन, दुसरीकडे भीषण पाणीटंचाई. या भयानक पाणीटंचाईमुळे माणसं जिथे पाणी मिळेल तिथून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे ही परिस्थितीत साक्षात इगतपुरीमध्ये आहे. या भागात पाऊस दरवर्षी चांगला पडतो. पण पाण्याचं नियोजन न झाल्यामुळे आदिवासी पाड्यांमध्ये आज भीषण पाणी टंचाई आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’कडून दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. या बातमीची दखल घेत मनसेचे पाणीदूत म्हणून ओळख असलेले मनोज चव्हाण हे आज आदिवासी पाड्यांवर टँकर घेऊन पोहोचले. इगतपुरी येथील नगर परिषद हद्दीतील वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कातोरे वस्ती शिवारातील आदिवासी पाड्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मनसेचे पणीदूत म्हणून ओळख असलेले मनोज चव्हाण यांनी मार्गी लावला आहे.

आदिवासी बांधवांना डोंगर दऱ्यातून जीव मुठीत घेऊन गढूळ झिऱ्यातील पाण्याने तहान भागवावी लागत होती. आदिवासी बांधवाना होणाऱ्या त्रासाबाबत टीव्ही 9 मराठीवर वृत्त प्रदर्शित करण्यात आलं. त्यानंतर मनोज चव्हाण हे आज स्वतः टँकर घेऊन आदिवासी पाड्यांवर पोहोचले. विशेष म्हणजे आता या आदिवासी पाड्यांना पावसाळा सुरु होईपर्यं टँकरने पाणी पुरवठा करणार, असा निश्चय मनोज चव्हाण यांनी केला आहे. मनोज चव्हाण यांच्या या मदतीमुळे आदिवासी बांधवाना पाणी मिळालं. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळालं.

‘महाराष्ट्रात 65 टक्के दुष्काळ’

यावेळी मनोज चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “टीव्ही 9 मराठीवर दोन दिवसांपूर्वी बातमी बघितली आणि इथे पोहचलो. गेली दहा वर्ष मराठवाडा आदिवासी भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही म्हणून गेली दहा वर्ष मी टँकर पूरवण्याचं काम करतोय. काल आमच्या लोकांना पाहणी करायला सांगितली. त्यांनी पाहणी केली. या वाड्यांमध्ये पाण्याची परिस्थिती खूप खराब आहे. महाराष्ट्रात 65 टक्के दुष्काळ पडलेला आहे. तो सांगितला जाणार नाही. जिथे पाणी नाही अशा 56 गावातील लोकांनी मला संपर्क केला, अशा ठिकाणी आमचं पाणी पोहचविण्याचं काम चालू आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज चव्हाण यांनी दिली.

मनोज चव्हाण यांची लोकप्रतिनिधींवर टीका

“लोकांना पाणी कसं मिळणार? ही भूमिका नाही. टक्केवारीत जास्त लक्ष असल्याचं दिसून येतंय. अनेक योजना राबविल्या जातात. पाईपलाईन येऊन पडते. मात्र काम पूर्ण होत नाही हे दिसून आलंय. लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचे हे महत्वाचं आहे. फोडाफोडीचे राजकारणात सर्व पक्ष गुंतलेले आहेत. जनतेच्या कामाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीय, असंच बघितलं पाहिजे यातून काही निष्कर्ष लागत नाही”, अशी टीका मनोज चव्हाण यांनी केली.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.