AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? मंदिर उघडण्याबाबत राज्यानं स्वत: निर्णय घ्यावा : भारती पवार

भारती पवार यांनी यावेळी आरोग्य सेवक नेमणूक, आरोग्य व्यवस्था, महाराष्ट्रातील मंदिर उघडण्यासंदर्भातील भूमिका, कोरोना विषाणू संसर्गाती तिसरी लाट आणि महिला सुरक्षा आदी मुद्यांवर भाष्य केलं.

बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? मंदिर उघडण्याबाबत राज्यानं स्वत: निर्णय घ्यावा : भारती पवार
भारती पवार
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 06, 2021 | 6:57 PM
Share

नाशिक: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. भारती पवार यांनी यावेळी आरोग्य सेवक नेमणूक, आरोग्य व्यवस्था, महाराष्ट्रातील मंदिर उघडण्यासंदर्भातील भूमिका, कोरोना विषाणू संसर्गाती तिसरी लाट आणि महिला सुरक्षा आदी मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात मंदिर बंद असल्यानं भारती पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

तिसऱ्या लाटेमुळं आरोग्य सेवकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय

राज्य सरकारकडे 3207 आरोग्य सेवकांची परवानगी मागितली होती. 2610 कर्मचाऱ्यांना सेवा परवानगी मिळाली होती. यामध्ये 597 नावं वगळण्यात आली होती. मात्र, या सर्व सेवकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोव्हीडच्या वातावरणात 597 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते. काही पीएसी ला कमी डिलिव्हरी झाल्याने या आरोग्य कर्मचाऱयांना सेवेतून वगळण्यात आले होते, असं भारती पवार म्हणाल्या.

कोरोना नियमांचं पालन करुन सण साजरे करा

कोरोना नियम पाळून सण साजरे करायला पाहिजे. गणेशोत्सवाचा उद्देशचं प्रबोधन करणे हा आहे. कोव्हिडं बाबत गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे. ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी, असं भारती पवार म्हणाल्या.

मंदिर सुरु करण्याबाबत राज्यानं निर्णय घ्यावा

बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? कमी लोकांमध्ये मंदिर उघडण्यास काय हरकत आहे. राज्याने मंदिर उघडण्याबाबत केंद्रावर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घ्यावेत, असं भारती पवार म्हणाल्या. कोव्हिडं मध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण येऊ नये, असं भारती पवार म्हणाल्या.

महिला अधिकाऱ्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती वाढलीय

महाराष्ट्रात महिला सुरक्षेच्या प्रश्नावर अनेक आंदोलन केले. महिला अधिकाऱ्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती वाढत असताना राज्य सरकार काहीच करत नाही. सरकार माता भगिनींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. करुणा शर्मा प्रकरणाबाबत काही माहिती नाही, मी बोलणार नाही, असं भारती पवार म्हणाल्या.

भेसळ करणाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाचा इशारा

आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई मध्ये भेसळ करणाऱ्या दुकांनदारांना अन्न औषध प्रशासनाने कारवाईची तंबी दिली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील मिठाई व्यसायिकांना एकत्र बोलवत अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्पादन दिनांक आणि एक्सपाईरी डेट अन्नपदार्थाच्या बॉक्सवर ठळकपणे दिसेल अशा प्रकारे छापव्या तसेच स्वच्छतेबाबत अधिक गंभीर राहण्याच्या सूचना दिल्या.या शिवाय जे व्यावसायिक भेसळ करतील किंवा शासनाच्या नियमांचे पालन करणार नाही अशा व्यावसायिकांवर पाच ते दहा लाख रुपयां पर्यन्त दंडात्मक कारवाई आणि पाच वर्ष कारावासाच्या शिक्षेस तयार रहावं असाही इशारा अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यानी मिठाई उत्पादक व्यवसायिक आणी मिठाई दुकांदारांना दिला आहे. अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी माहिती दिली आहे.

इतर बातम्या:

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप

मेहबूब शेख यांचं आव्हान चित्रा वाघ यांनी स्वीकारलं, म्हणाल्या, ‘मलाही दम बघायचाय’

Union State Minister Bharati Pawar said Temple should decision taken by state

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं