AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयंकर! नवी मुंबईत भरधाव कारने 10 जणांना उडवलं; दोघांचा जागीच मृत्यू

navi mumbai accident : नवी मुंबईत भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

भयंकर! नवी मुंबईत भरधाव कारने 10 जणांना उडवलं; दोघांचा जागीच मृत्यू
| Updated on: Jul 07, 2026 | 3:13 PM
Share

मुंबईसह नवी मुंबईत पावसाचा कहर सुरू असताना एक भीषण अपघाताची घटना घडली आहे . नवी मुंबईच्या सेक्टर 10 मध्ये हा भीषण अपघात घडला आहे. कारवरील नियंत्रण सुटलेल्या चालकाने 8 ते 10 जणांना उडवलं. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 10 जणांना उडवल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातात काही जणांची प्रकृती स्थिर आहे. तर काही जणांची चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू  

नवी मुंबई पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा सुरू केला. त्यानंतर फरार चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघातामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर एका कारचंही मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. तर काहींना जखमींना रुग्णालयात दाखल केले. भीषण अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघाताची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नियंत्रण सुटलेल्या कारच्या धडकेमुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय. अपघातानंतर परिस्थितीचं गांभीर्य पाहून कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाला. पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजतंय. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नवी मुंबईतील भीषण अपघातानंतर आता पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणे सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. तसेच वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहनातील सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. रस्त्यावर बेदरकारपणे कार चालवणाऱ्यावर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

Follow Us
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण
अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरात
अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरातील धक्कादायक Video
सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Congress Andolan | सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!; पडळकरांचा विरोधकांवर घणाघात
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांची भेट
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांच्या भेटीबाबत दत्तात्रय भरणे स्पष्टच म्हणाले...
कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा
Siya-ketan Case Update | कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा रिकव्हर झालाच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच भरलेलं जहाज...
अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले
Ambadas Danve | अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले; सरकारच्या प्रकल्पांवर दानवेंचा सणसणीत वार
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद पवार गट सत्तेत जाणार की...