AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : कुठल्याही योजनांच्या घोषणा करण्याआधी बजेट विचारात घ्या; सुप्रीम कोर्टाचा सरकारांना सल्ला

कुठल्याही सरकारी योजनेची घोषणा करण्याआधी त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी आहे का? तुमचे तेवढे बजेट आहे का? याचा विचार करा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. घोषणा आणि अंमलबजावणी यात मोठी तफावत दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.

Supreme Court : कुठल्याही योजनांच्या घोषणा करण्याआधी बजेट विचारात घ्या; सुप्रीम कोर्टाचा सरकारांना सल्ला
‘लिव्ह-इन’मध्ये जन्मलेल्या मुलाचा पित्याच्या संपत्तीवर हक्कImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 06, 2022 | 10:25 PM
Share

नवी दिल्ली : राज्ये तसेच केंद्र सरकारकडून विविध सरकारी योजनांची घोषणा (Announcement) केली जाते. अनेकदा त्यातील बर्‍याच योजना निधीअभावी किंवा अन्य कारणांमुळे कागदावरच राहतात. परिणामी, त्या योजना म्हणजे जनतेला दिलेले पोकळ आश्वासन ठरते. अशाप्रकारच्या घोषणांना लगाम घालण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व राज्ये आणि केंद्र सरकारला नियोजनाचा डोस पाजला. कुठल्याही सरकारी योजनेची घोषणा करण्याआधी त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी आहे का? तुमचे तेवढे बजेट आहे का? याचा विचार करा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. घोषणा आणि अंमलबजावणी यात मोठी तफावत दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले. (Consider the budget before announcing any plans Supreme Court advises governments)

सरकारी योजनांच्या घोषणांना लगाम घालण्याच्या अनुषंगाने सल्ला

न्यायमूर्ती यू.यू. ललित, न्यायमूर्ती एस.आर. भट आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठापुढे आज एका प्रकरणाची सुनावणी झाली. अत्याचारग्रस्त महिलांना कायदेशीर मदत देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित कराव्यात, यासंदर्भात न्यायालयाने सरकारांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने वारेमाप सरकारी घोषणांना लगाम घालण्याच्या अनुषंगाने सरकारांना सल्ला दिला, असे लाईव्ह हिंदुस्तानने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

शिक्षण हक्क कायद्याचे काय झाले? शाळा कुठेत? शिक्षक कुठेत?

सरकारने कुठल्याही योजनेची घोषणा करण्यापूर्वी त्या योजनेच्या आर्थिक परिणामांचा विचार केला पाहिजे. आम्ही तुम्हाला शिक्षण हक्क कायद्याचे उत्कृष्ट उदाहरण देतो. तुम्ही शिक्षण हक्क कायदा बनवलात, परंतु शाळा कुठे आहेत?, असा खडा सवाल यावेळी न्यायमूर्तींनी उपस्थित केला. जेव्हाही तुम्ही अशा योजना किंवा कल्पना आणता, तेव्हा नेहमी आर्थिक परिणाम लक्षात घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

केंद्र सरकारने मांडली बाजू

सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारीमध्ये अत्याचारग्रस्त महिलांच्या सोईसुविधांबाबत सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यात कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यांतर्गत विविध राज्यांनी उचललेल्या पावलांचा तपशील सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. त्यावर बुधवारच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित राहिलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाच्या आधीच्या निर्देशानुसार तपशील देण्यासाठी काही वेळ देण्याची विनंती त्यांनी खंडपीठापुढे केली. खंडपीठाने त्यांच्या विनंतीची दखल घेतली. (Consider the budget before announcing any plans Supreme Court advises governments)

इतर बातम्या

‘INS विक्रांत’ हा सर्वात मोठा घोटाळा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संजय राऊत आक्रमक

Shocking : जेवणाच्या पैशांवरुन तुफान राडा, 17 जणांकडून जीवघेणा हल्ला! कामोठ्यातील धक्कादायक घटना

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली