AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : त्यांना झोपू द्यायचं नाही असा पण केला, आणि…; भाजपा कार्यकारिणीत फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची कथा

राज्यात अडीच वर्ष अघोषित आणीबाणी होती. सरकार कोण चालवतंय, ते रामभरोसे होतं. ते पाहून वाटायचं की हे कसलं सरकार आहे? अशा भ्रष्ट सरकारला एक दिवस झोपू द्यायचं नाही असा पण केला. भाजपा (BJP) कार्यकर्त्यांचे आभार, त्यांनी या संघर्षात साथ दिली, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : त्यांना झोपू द्यायचं नाही असा पण केला, आणि...; भाजपा कार्यकारिणीत फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची कथा
भाजपा कार्यकारिणीत मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीसImage Credit source: Twitter
| Updated on: Jul 23, 2022 | 5:31 PM
Share

नवी मुंबई : सरकार बदला घेतं होतं आणि भ्रष्टाचार करत होतं. त्यांना एक दिवस झोपू द्यायचं नाही असा पण केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. नवी मुंबईत आयोजित भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), त्यांचे सहकारी यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, की हे सरकार यावं, ही तर श्रींची इच्छा होती. राज्यातील 12 कोटी जनतेची इच्छा होती, त्यांना परिवर्तन हवं होतं, ती इच्छा पूर्ण केली आहे. एक प्रकारे मोकळा श्वास आपण घेतो आहोत. गेली अडीच वर्ष संघर्षात गेली. राज्यात अडीच वर्ष अघोषित आणीबाणी होती. सरकार कोण चालवतंय, ते रामभरोसे होतं. ते पाहून वाटायचं की हे कसलं सरकार आहे? अशा भ्रष्ट सरकारला एक दिवस झोपू द्यायचं नाही असा पण केला. भाजपा (BJP) कार्यकर्त्यांचे आभार, त्यांनी या संघर्षात साथ दिली, असे फडणवीस म्हणाले.

‘महाराष्ट्रात आश्चर्य घडलं’

विकासाची गती कमी झाली, प्रगतीचे सर्व कार्यक्रम ठप्प, स्थगिती. जे चांगलं आहे ते करायचंच नाहीये, अशी भूमिका केंद्राने कोट्यवधी रुपये देऊन सुरू केलेले प्रकल्प बंद करण्याचं काम त्या सरकारनं केलं. खुर्चीसाठी नाही, खुर्च्या येतात जातात, असे फडणवीस म्हणाले. या महाराष्ट्रात आश्चर्य घडलंय. सत्तेत एक ताकद असतं, लोहचुंबक असतं. राज्यात पहिल्यांदा 50 आमदारांनी, त्यात 9 मंत्री यांनी सरकार सोडून विरोधकांसोबत येण्याचा निर्णय केला. ज्या प्रकारे वागणूक मिळत होती, सरकार सुरू होतं. त्यांना माहीत होतं, की सरकार असचं चालवलं, तर पुढच्या निवडणुकीत दिसणार नाही, असे ते म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

एकनाथ शिंदेंचं कौतुक

फडणवीस म्हणाले, मनापासून अभिनंदन करीन एकनाथ शिंदे यांचं. एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला. ते बाहेर पडले तेव्हा ठरलं नव्हतं की सरकार येईलच. असं घडलं नसतं तर त्यांचं सामाजिक, राजकीय जीवन समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. त्यांनी ठरवलं, बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या विचारांशी जर फारकत घेतली जात असेल, ज्यांच्याशी लढा केला त्यांच्या अधिपत्याखाली काम करावं लागत असेल. ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जावं लागत असेल. सावरकरांचा अपमान रोज सहन करायचा. दाऊदशी संबंधित मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्याविरोधात बोलता येत नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक हे सहन करू शकत नव्हता. हे परिवर्तन सत्तेसाठी नाही विचारांसाठी आहे. राज्यासाठी हे आवश्यक होतं म्हणून ते केलं, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...