AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई मार्केट परिसरात झुंबड गर्दी, महापालिका आयुक्त अभिजित बांगर अ‍ॅक्शन मोडमध्ये

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याशिवाय, नवी मुंबईत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे (Navi Mumbai Crowd In Market).

नवी मुंबई मार्केट परिसरात झुंबड गर्दी, महापालिका आयुक्त अभिजित बांगर अ‍ॅक्शन मोडमध्ये
Navi Mumbai Market
| Updated on: Mar 01, 2021 | 3:15 PM
Share

नवी मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याशिवाय, नवी मुंबईत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे (Navi Mumbai Crowd In Market). रुग्ण संख्येने सव्वाशेचा आकडा ओलांडल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे पालिकेची कोव्हिड केंद्रं पुन्हा कामाला लागली आहेत. तर रुग्णांना त्वरित सेवा मिळावी याकरिता तुर्भे येथील बंद केलेले दोन उपचार केंद्र राखीव असून सर्वच बेड तयार करण्यात आले आहेत (Navi Mumbai Crowd In Market).

शिवाय, कोरोना काळात सेवा पुरवणाऱ्या शासकीय आणि खासगी रुग्णालये तयारीला लागले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत कोरोनाचा वाढता प्रभाव कोरोनाशी लढ्यासाठी पालिका प्रशासन पुन्हा सज्ज झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

Navi Mumbai Market

Navi Mumbai Market

एपीएमसी मार्केटमधील गर्दीचे काय?

नवी मुंबईतील विविध शहरात महापालिका फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत. परंतू एपीएमसी मार्केट परिसरात मात्र अद्याप नागरिक सजग नसल्याचे दिसून येत आहे. एपीएमसी वाहतूक पोलीस चौकी पासून माथाडी भवन परिसरापर्यंत अनाधिकृत व्यापारी बसून व्यापार करत आहेत. शिवाय, रस्त्यावर वाहनांना देखील जाण्यास जागा राहिलेली नाही.

या ठिकाणी खरेदीसाठी नियमित झुंबड उडत असून प्रचंड गर्दी येथे केली जात आहे. त्यामुळे रुग्ण वाढीस वाव मिळत असून पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. तुर्भे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने येथे दररोज हा व्यापार राजरोजसपणे चालतो. त्यामुळे या गर्दीवर अकुंश नाही ठेवल्यास रुग्ण संख्या झपाट्याने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे (Navi Mumbai Crowd In Market).

महापालिका लागली कामाला

रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने शहरातील अनेक कोव्हिड सेंटर बंद करण्यात आली होती. महानगरपालिकेच्या माध्यमातून चौदा कोव्हिड सेंटर सुरु होती. त्यापैकी बारा केंद्रं बंद करण्यात आली आहेत. परंतू, पुन्हा महापालिका कामाला लागली असून गरज भासल्यास टप्याटप्प्याने उपचार केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानुसार, संबंधित जागेच्या साफसफाईसह इतर आवश्यक कामे केली जात आहेत. औषधे आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन सुरु झाले आहे. रुग्णवाढीचा वेग वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझर्स आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.

Navi Mumbai Crowd In Market

संबंधित बातम्या :

सावधान ! कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करा, पण जरा जपूनच, बँक खाते होऊ शकते रिकामी

Covid19 vaccination in Maharashtra : शरद पवारांनीही कोरोना लस घेतली, महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते

Maharashtra Washim Corona Update: कोरोनाचा विळखा वाढला,पोहरादेवीमध्ये 21 तर वाशिमध्ये 187 नवे रुग्ण

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.