पूजेच्या साहित्याने पनवेल बाजारपेठ फुलली, गणेशोत्सवामुळे पूजेच्या साहित्याला मोठी मागणी

मागच्या 2 वर्षाच्या कोरोना काळात सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. गणेशोत्सव काय कुठलेही सण साजरा करता आले नाही. मात्र यंदा करूनच या नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने लोकांची पावलं गणेशोत्सवाच्य खरेदीसाठी बाजाराकडे बोलतान पाहायला मिळत आहे.

पूजेच्या साहित्याने पनवेल बाजारपेठ फुलली, गणेशोत्सवामुळे पूजेच्या साहित्याला मोठी मागणी
Market Ready for Ganeshotsav
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 11:13 AM

नवी मुंबई : मागच्या 2 वर्षाच्या कोरोना काळात सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. गणेशोत्सव काय कुठलेही सण साजरा करता आले नाही. मात्र यंदा करूनच या नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने लोकांची पावलं गणेशोत्सवाच्य खरेदीसाठी बाजाराकडे बोलतान पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी बजारपेठे फुलली आहे. गणेशोत्सवासाठी लागाणाऱ्या पूजेच्या साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. गोकुळाष्टमी पासून पूजेच्या साहित्यांची खरेदी चांगली सुरु झाली आहे. पूजेच्या वस्तू आणि साहित्यात थोडाफार प्रमाणात भाव वाढ सुद्धा झाली आहे. मात्र याचा परिणाम खरेदीवर होणार नाही. तसेच ग्राहकांची संख्या वाढली आहे त्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत व्यवसाय चांगला असेल अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली.

गणेशोत्सव काळात कापूर, कंठी, लाल कपडा रुमाल, अगरबत्ती, धूप, लाकडी पाठ, समई , निरंजन, पितळेचे ताठ, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी या वस्तूंना मोठी मागणी असते.

यंदा तांबे आणि पितळीच्या वस्तूंची प्रचंड भाववाढ

मागच्या वर्षी तांब्याचा किलोचा भाव 700 रुपये किलो इतका होता, तो आता 1100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर पितळ मागच्या वर्षी 450 रुपये किलो इतके होते ते आता 700 रुपयांपर्यंत पोचलेले आहे. कच्चा माल वाढल्याने ही भाववाढ 20 ते 25 टक्के भाववाढ झाली असल्याचे दुकानदार सांगतात. तांब्याचे भांडे हे पुणे आणि रोहा या ठिकाणाहून विक्री साठी येते तर पितळ हे मुरादाबाद दिल्ली येथून विक्रीसाठी येते.

सणासुदीच्या काळात बदाम, पिस्ता सुद्धा महागला

सण उत्सवात खाद्यपदार्थात लज्जत वाढवणाऱ्या काही साहित्याच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ, तर काहींच्या दरात स्थिरता दिसून आली. प्रमुख साहित्य असलेले बदाम, खारे वआणिसाध्या पिस्ताच्या दरामध्ये 200 ते 400 रुपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिकांच्या आर्थिक संकटांमध्ये वाढ होत आहे आणि दुसरीकडे सणांच्या दिवसात गॅस, डिझेल, पेट्रोल याचे दर सातत्याने वाढत आहे. त्यात भर पडली आहे ती सुक्या मेव्याची.

गणपतीमध्ये विविध गोड पदार्थ केले जातात. त्यामध्ये सुक्या मेव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर असतो. त्यामुळे सण साजरे करायचे तरी कसे असा प्रश्न सर्व सामान्यांकडून विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बदाम, पिस्ता यांसारख्या सुक्या मेव्यांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे.

पूजेच्या वस्तू आणि त्यांचा दर

कापूर – 1000 रू किलो , 250 रुपये 250 ग्राम

कंठी – 40 रुपया पासून 700 रुपया पर्यंत

रुमाल – 20 रुपया पासून 200 पर्यंत

अगरबत्ती – 100 रुपया पासून 1000 पर्यंत

धूप – 400 रुपये किलो

लाकडी पाट – 100 रुपया पासून 1000 रुपयापर्यंत

समई – 600 पासून 30 हजारपर्यंत

पितळेचे ताठ – 100 रुपयांपासून ते 500 , 700 रुपयांपर्यंत

संबंधित बातम्या :

मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार, पण महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट! श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना यंदाही मुख्य मंदिरातच

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.