नवी मुंबई : वाढीव फी न भरल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले पाठवणाऱ्या शाळेविरोधात खारघरमध्ये पालकांनी ठिय्या आंदोलन केलं. अखेर 8 तास पालकांच्या ठिक्या आंदोलनानंतर खारघरच्या विश्वजीत इंटरनॅशनल स्कुलने पालकांसमोर माघार घेतलीय. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे दाखले मागे घेतलेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी सकाळी 10 वाजल्यापासून खारघरच्या विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूलसमोर आंदोलन केलं होतं. विशेष म्हणजे युवासेना आणि मनसे विद्यार्थी सेनेने राजकारण दूर ठेवत पालकांना पाठिंबा दिला. त्यामुळेच राजकीय दबावानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट मागे घेतले (Parents protest against School action for fee in Kharghar Navi Mumbai).