AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिपिंग क्षेत्रातील आर्थिक फसवणूक थांबवा, सिफेरर्सकडून ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्यपालांना निवेदन

शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक सिफेरर्स तरूणांची आर्थिक फसवणूक केली जाते. अनेक एजेंट आणि बनावट कंपन्या हे तात्पुरत्या भाडे तत्वावर कार्यालय चालू करतात.

शिपिंग क्षेत्रातील आर्थिक फसवणूक थांबवा, सिफेरर्सकडून ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्यपालांना निवेदन
All India Seafarers Union meet Governor Bhagat Singh
Reporter Harshal Bhadane Patil
Reporter Harshal Bhadane Patil | Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 3:16 PM
Share

नवी मुंबई : शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक सिफेरर्स तरूणांची आर्थिक फसवणूक केली जाते. अनेक एजेंट आणि बनावट कंपन्या हे तात्पुरत्या भाडे तत्वावर कार्यालय चालू करतात. सोशल मीडियावर जाहिरातीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीचे आमिष देतात आणि आर्थिक फसवणूक करतात. तसेच त्यांचे सी. डी. सी आणि पासपोर्टसुद्धा ठेवून घेतात. त्यामुळे तरुणांना इतरत्र नोकरी शोधता येत नाही.

शिपिंग क्षेत्रात नोकरीच्या नावाखाली पैसे उकळण्याचे अनेक गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे हे क्षेत्र बदनाम होऊ लागले आहे. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची 26 जुलैला राजभवनात भेट घेतली. त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. त्यावेळी राज्यपालांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेला दिले.

संघटनांकडून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न 

बनावट शिपिंग कंपन्या सर्रास मोठमोठ्या शिपिंग कंपन्यांच्या लेटरहेडवर नियुक्तीपत्र, बनावट व्हिसा, फ्लाईट तिकीट आणि इतर कागदपत्र देत आहेत. या क्षेत्रात येणारे सिफेरर्स त्यांना पैसे देतात. बरेच वेळेस हे कायद्याच्या कचाट्यात अडकून देखील यांच्यावर चाप बसत नाही. त्यामुळे अशा बनावट कंपन्यांचे फावत असल्याचे युनियनने राज्यपालांच्या लक्षात आणून दिले. याबाबत आंदोलने आणि कायदेशीर पद्धतीने सदर घटनांना घालून त्या विरोधात लढा दिला. तसेच  कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे संघटनेने राज्यपालांच्या लक्षात आणून दिले.

कंपन्या चालवणारे मास्टर माईंड परराज्यात

अनेकदा प्रशासनाकडून मिळणारी अपुरी मदत आणि सर्रास कंपन्या चालवणारे मास्टर माईंड हे परराज्यात बसून अशा तऱ्हेची फसवी यंत्रणा चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनला देखील मर्यादा पडत आहेत. यावेळी सिफेरर्सच्या लसीकरणात येणाऱ्या समस्या, गोव्याच्या सिफेरर्सचे काही प्रश्न या बाबतीत अनेक विषयांचावर चर्चा करण्यात आली.

(Stop financial fraud in the shipping sector All India Seafarers Union meet Governor Bhagat Singh Koshyari)

संबंधित बातम्या : 

राज्यात ओढवलेल्या पूरपरिस्थितीग्रस्तांना नवी मुंबई महापालिकेमार्फत 1 कोटी रुपये द्या, मंदा म्हात्रेंची मागणी

पूरग्रस्तांसाठी वर्सोवा मनसे सरसावली; कोकण, महाड, चिपळूणकडे कपडे, खाण्याची सामग्री रवाना

पनवेलचे भूमिपूत्र अभिजीत पाटील ‘मेड इन इंडिया आयकॉन 2021’चे मानकरी, राज्यपालांच्या हस्ते सन्मान

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली