AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लोकसभेला आमच्याकडे सांगायला काहीही नव्हतं, पण आता…”, रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

"आता महिला अत्याचाराच्या घटनांचा संबंध लाडकी बहीण योजनेसोबत जोडून विरोधक त्याला वेगळं वळण देण्याचे प्रयत्न करत आहेत", असा घणाघातही रुपाली चाकणकर यांनी केला.

लोकसभेला आमच्याकडे सांगायला काहीही नव्हतं, पण आता..., रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
रूपाली चाकणकरImage Credit source: Facebook
| Updated on: Sep 20, 2024 | 11:47 AM
Share

Rupali Chakankar On Maharashtra Vidhansabha : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी लोकसभा पराभवाबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचेही कौतुक केले.

रूपाली चाकणकर या गेल्या काही दिवसांपासून जळगावात आहेत. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा जळगावात मेळावा पार पडत आहेत. यावेळी त्या म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यात असेल किंवा राज्यात असेल महायुतीसाठी अतिशय उत्तम वातावरण आहे. कारण यापूर्वी आम्ही जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जात होतो, तेव्हा जनतेपर्यंत किंवा महिलांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे काही योजना नव्हत्या. आम्ही काही उपक्रम राबवतो, हे सांगण्यासारखंही आमच्याकडे फारसं काही नव्हतं. पण आता राजकारणाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजना राबवणारे महाराष्ट्रातील महायुती सरकार पहिलं सरकार आहे. त्यामुळे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, असे रुपाली चाकणकरांनी म्हटले.

“विरोधक त्याला वेगळं वळण देण्याचे प्रयत्न करतात”

महिलांना महायुती सरकारवर विश्वास आहे. या सगळ्यांनी एकत्रित सरकारला पाठिंबा दिला आहे आणि हे सरकार पुढे पाच वर्ष अखंडित राहावं हा विश्वास देखील त्या व्यक्त करताना दिसत आहेत. लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा योजना या सगळ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने पडसाद महिलांमध्ये उमटताना दिसत आहेत. एकंदर जळगावमध्ये महायुतीसाठी अतिशय पोषक वातावरण आहे. यापूर्वी संजय गांधी निराधार योजना आणली होती, मात्र कुठल्याही महिला अत्याचाराची घटना घडली तर तिचा संबंध त्या योजनेची जोडला नाही. मात्र आता महिला अत्याचाराच्या घटनांचा संबंध लाडकी बहीण योजनेसोबत जोडून विरोधक त्याला वेगळं वळण देण्याचे प्रयत्न करत आहेत, असा घणाघातही रुपाली चाकणकर यांनी केला.

“महाराष्ट्रातली जनता सुज्ञ”

“महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. भगिनी सुज्ञ आहेत. केवळ लाडकी पण नाही तर शेतकरी असतील रोजगार असतील मुलींना मोफत शिक्षण असेल. वयोश्री योजना असेल. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी योजना आणली आहे. विरोधकांच्या टीका पाहिल्या तर आपल्याला कळेल की त्यांना किती नैराश्य आलं आहे. आता विरोधकांना प्रश्न पडला आहे की विधानसभेला समोर जाताना आपण लोकांसमोर काय घेऊन जावं? त्यांना सांगण्यासारखं काही नाही, त्यामुळे त्यांना टीका करणे हे एकमेव माध्यम उरला आहे”, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

लाडकी बहीण योजना बंद करायची, महिलांच्या खात्यात पैसे पडू द्यायचे नाही यासाठी अक्षरशः विरोधक सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. त्यामुळे महिलांना कोण विरोध करत आहे, कोण आपल्या योजनेमध्ये आडकाठी आणत आहे, हे कळत आहे. या विधानसभेमध्ये महिला त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. त्यामुळे विरोधकांनी किती टीका केली तर विधानसभेमध्ये आपलं चित्र स्पष्ट होईल, असेही रुपाली चाकणकरांनी म्हटले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत