AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaggan Bhujbal : फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ पहिल्यांदांच माध्यमांसमोर, थेट म्हणाले…

महायुतीच्या विजायनंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे माध्यमांसोर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं.

Chaggan Bhujbal :  फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ पहिल्यांदांच माध्यमांसमोर, थेट म्हणाले...
फडणवीसांच्या भेटीत काय चर्चा झाली, भुजबळ स्पष्ट बोलले
| Updated on: Dec 23, 2024 | 11:57 AM
Share

महायुतीच्या विजायनंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे माध्यमांसोर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं. या भेटीत फडणवीस यांच्याशी सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा झाली. महायुतीच्या विजयात ओबीसींचा जे पाठबळ मिळालं त्याचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशिर्वाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

फडणवीसांनी भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं समजतंय. 10 दिवसांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचीी चर्चा आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?

मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर बोललो. काय काय घडलं, काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, वर्तमानपत्र आणि मीडियातून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या. ते म्हणाले, हे आपण मान्यच करायला हवं, की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असं भुजबळांनी नमूद केलं.

फडणवसींचा भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला

पण आता जे काही राज्यात सुरू आहे. आता पाच सहा दिवस मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या आहेत. वेगळं वातावरण आहे. एक आठ दहा दिवस मला तुम्ही द्या. त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू, असं फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असं फडणवीस म्हणाले. आठ दहा दिवस वेळ द्या, असं फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी नमूद केलं. एकंदरच फडणवीसांनी भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं समजत असून येत्या काही दिवसातंच ते भुजबळांबद्दल महत्वाचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.