सरकार गरिबांची थट्टा करतंय; मॅनहोल दुर्घटनेवरून रोहित पवार भडकले, निष्काळजीपणाचा सगळा हिशोब मांडला
मुंबईत एकीकडे पावसाचा कहर सुरू आहे. दुसरीकडे दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर साकिनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकावर संताप व्यक्त केला आहे. सरकार गरिबाची थट्ट करतंय, असं म्हणत रोहित पवार यांनी […]

मुंबईत एकीकडे पावसाचा कहर सुरू आहे. दुसरीकडे दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर साकिनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकावर संताप व्यक्त केला आहे. सरकार गरिबाची थट्ट करतंय, असं म्हणत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले.
मुंबईच्या साकिनाक्यातील मॅनहोल दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार म्हणाले, ‘मुंबईला किती अधिकाऱ्यांची गरज होती आणि किती अधिकारी देण्यात आले, याचा अभ्यास केला पाहिजे. पालिकेचे मोठे अधिकारी हे कनिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रकरण ढकलून मोकळे होत आहेत. हे योग्य नाही. बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. वर्षभरात मॅनहोलवर जाळी लावणे, गटार साफ करणे यासाठ अडीचशे कोटी रुपये महापालिका खर्च करत असते. अडीचशे कोटी खर्च करूनही जाळ्या व्यवस्थित लावल्या जात नाहीत’.
‘जून महिन्यात पाऊस येतो, त्यामुळे मे महिन्यात सर्व कामे व्हायला पाहिजे होते. दुर्दैवाने ते काम झालं नाही. तर हे अयोग्य आहे. मॅनहोलला शंभर टक्के जाळ्या लावण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मग आतापर्यंत जाळ्या का लावल्या नाहीत? दरवर्षी सहा ते सात जण मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडतात. या घटनेला महापालिका जबाबदार आहे. पालिकेवरील सत्ताधारी जबाबदार आहेत. सामान्य लोक मॅनहोलमध्ये पडत आहेत. लहान मुलांच्या अंगावर झाडे पडत आहेत. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे विधानसभेत येऊन थट्टा करत आहेत. हे सरकार निर्लज्ज झालं आहे. यांना गरीबांचं पडलं नाही, असं आमचं ठाम मत आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसहित इतर अधिकाऱ्यांनाही दोषी धरलं पाहिजे, असं म्हणत रोहित पवार यांनी महायुती सरकावर टीका केली.
