कर्मचाऱ्यांना लॉटरी! महिन्याला घसघशीत पगारवाढ, वार्षिक बोनसही 50000 मिळणार; नेमका कसा करार झाला? रविंद्र चव्हाणांची महत्त्वाची भूमिका
NCPA मधील सर्व कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली. त्यांच्या महिन्याला पगारात घसघशीत वाढ झाली. त्यांना वार्षिक बोनसही 50000 मिळणार आहे.

भाजप-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) सोबत कामगारांच्या हितासाठी वेतनवाढ करार यशस्वीपणे संपन्न केलाय. त्यांनी हा करार भाजप प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात झाला. या वेतनवाढ कराराची अंमलबजावणी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2028 या कालावधीसाठी झाली. याचा अर्थ 4 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलीये. आता या करारानुसार NCPA मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 7250 रुपयांची वाढ दिली. यासहित कर्मचाऱ्यांना वर्षाला 50000 बोनस मिळणार आहे, अशी माहिती रविंद्र चव्हाणांनी दिली.
रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले, हा करार NCPA व्यवस्थापन आणि कामगार संघटनेदरम्यान झालेला तिसरा वेतनवाढ करार झाला आहे. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने संघटनात्मक कामगिरीच्या कामगारांच्या वेतनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. याआधी NCPA मध्ये मुंबई लेबर युनियन ही बहुसंख्य कामगारांची संघटना होती. आता अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघानं संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम करत आहे. मुंबई लेबर युनियचे संपूर्ण सदस्यत्व अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघामध्ये आणले आहेत. त्यानंतर औद्योगिक न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेतून अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ ही NCPA मधील सर्वात मोठी संघटना आहे’.
या ऐतिहासिक वेतनवाढ कराराच्या स्वाक्षरी समारंभास NCPA च्या वतीने अध्यक्ष संटूक, संचालक फ्रेडी तलाठी, तांत्रिक संचालक काळे, मानव संसाधन विभागाचे व्हिन्सेंट डिसूझा यांनी हजेरी लावली. तर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाकडून सुहास माटे, प्रशांत वर्तक उपस्थित होते. यासहित संघटनेचे प्रमुख पदाधिकारी होते.
करारानंतर रविंद्र चव्हाण काय म्हणाले?
रविंद्र चव्हाण म्हणाले, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. हे यश एकजूट, संघटनात्मक ताकद, कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे. आता NCPA मधील कामगारांना मिळालेली ही वेतनवाढ भविष्यातील चांगल्या सेवा-सुविधा आणि कामगार कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे’.
