AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper Leak: मोठी बातमी! थेट मोबाईल फोनमध्येच पेपर, रात्रभर केलेल्या चौकशीत माटेगावकरांनी काय सांगितलं?

NEET Paper Leak: लातूर येथील शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी सीबीआयने नीट पेपर लीक प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणात रात्रभर चौकशीत नेमकं काय समोर आलं जाणून घ्या...

NEET Paper Leak: मोठी बातमी! थेट मोबाईल फोनमध्येच पेपर, रात्रभर केलेल्या चौकशीत माटेगावकरांनी काय सांगितलं?
Shivraj Mategaonkar Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 18, 2026 | 1:35 PM
Share

सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये सापडले. त्यानंतर आता लातूर देखील रडारवर असल्याचे समोर आले आहे. लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर (वय ४७) यांना नीट युजी (NEET UG) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून अटक केली आहे. रविवार, 17 मे 2026 रोजी सायंकाळी 7:15 वाजता ही धडक कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे लातूरसह संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सीबीआय तपासातील धक्कादायक खुलासे

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर हे पेपर लीक करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचे सक्रिय सदस्य आहेत. तपासादरम्यान खालील अत्यंत गंभीर बाबी समोर आल्या आहेत:

परीक्षेपूर्वीच पेपर हस्तगत: तपासात असे निष्पन्न झाले आहे की, परीक्षेच्या आधीच म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजी मोटेगावकर यांनी नीट युजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरे मिळवली होती.

मोबाईलमध्ये पुरावे: 14 मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीत, त्यांच्या मोबाईल फोनमध्ये या परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले होते.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न: परीक्षा पार पडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रश्नपत्रिका डिलीट/नष्ट केल्याचे तपासात समोर आले आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ: ही प्रश्नपत्रिका त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आणि व्यक्तींना पुरवल्याचा संशय आहे. मात्र, ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांना हे पेपर दिले गेले, त्यांची नावे सांगण्यास मोटेगावकर यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना टाळाटाळ केली.

गंभीर कलमांअंर्गत गुन्हा दाखल

शिवराज मोटेगावकर यांच्यावर खालील कायद्यांनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे:

१. भारतीय न्याय संहिता (BNS)

२. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (PC Act)

३. सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४

त्यांच्यावर फसवणूक करणे, गुन्हेगारी कट रचणे आणि राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत गैरप्रकारांना खतपाणी घालणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?