AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिल्यास आरक्षण देणे भाग पडेल, नितेश राणेंचा टोला

तसेच राज्य शासनाने देऊ केलेले ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आरक्षण केंद्र शासनाचा निर्णय असल्याचे आमदार नितेश राणे यांनी अधोरेखित केले. nitesh rane thackeray government maratha reservation

महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिल्यास आरक्षण देणे भाग पडेल, नितेश राणेंचा टोला
नितेश राणे, आमदार, भाजप
| Edited By: | Updated on: Jun 01, 2021 | 4:20 PM
Share

धुळे: महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. आरक्षणाच्या भीतीपोटी राज्य शासनाने लॉकडाऊन 16 जूनपर्यंत वाढवला. महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिले, तर शासनाला आरक्षण देणे भाग पडेल, असं भाजपचे आमदार नितेश राणे म्हणालेत. तसेच राज्य शासनाने देऊ केलेले ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आरक्षण केंद्र शासनाचा निर्णय असल्याचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी अधोरेखित केले. (Nitesh Rane Criticism On Thackeray Government Maratha Reservation Issue)

महाविकास आघाडी चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची फसवणूक

आमदार नितेश राणे धुळ्यात पत्रकारांशी बोलत होते. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची बैठक झाली, त्यानंतरही आमदार नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. या वेळी खासदार डॉ . सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते . आमदार नितेश राणे म्हणाले की, महाविकास आघाडी चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची फसवणूक करत आहे, महाविकास आघाडीने आरक्षणाच्या प्रश्नाचा खून केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

त्यात कोणी तिसऱ्याने हस्तक्षेप अथवा बोलण्याची गरज नाही

संभाजीराजे छत्रपती आरक्षणासाठी राज्यभर फिरत आहेत. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. त्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका नाही. मी आज धुळ्यात तर संभाजीराजे छत्रपती सिंधुदुर्गात आहेत. एवढा आमच्यातील गोडवा आहे. त्यात कोणी तिसऱ्याने हस्तक्षेप अथवा बोलण्याची गरज नाही, असेही नितेश राणे म्हणाले. महाविकास आघाडी चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

गायकवाड समितीने केलेल्या शिफारशीतील मुद्दे मांडले गेले नाहीत

सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल झाल्यावर महाविकास आघाडी शासन आरक्षणविषयीची भूमिका मांडण्यास कमी पडले. गायकवाड समितीने केलेल्या शिफारशीतील मुद्दे मांडले गेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण सरसकट नाकारले गेले. आता मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे आकडे कमी झाले आहे. परंतु आरक्षण नाकारल्यामुळे महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना राज्यात फिरता येणार नाही. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन 16 जूनपर्यंत वाढविला आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

संबंधित बातम्या :

‘कोकणावर राजकारणासाठी जेवढं प्रेम केलं जाते, तेवढंच प्रेम अशा संकटाच्या काळातही केलं जावं’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मोदी संवेदनशील, पण मी विरोधी पक्षनेत्यासारखं वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा जहरी वार

nitesh rane criticism on thackeray government maratha reservation issue

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.