AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा संतापले, म्हणाले कशाला पाहिजे नाटकं….

सध्या राज्यात वक्फ बोर्ड आणि परीक्षेदरम्यान बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी हे दोन मुद्दे चांगलेच तापले आहेत, यावर बोलताना पुन्हा एकदा नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा संतापले, म्हणाले कशाला पाहिजे नाटकं....
| Updated on: Feb 05, 2025 | 4:47 PM
Share

राज्यात लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र काही दिवासंपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं होतं. मात्र नितेश राणे यांच्या या मागणीला विरोध होत आहे.  तसेच राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे, या दोन्ही विषयांवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. ते श्रीगोंदा येथे बोलत होते.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

जिहाद्यांचा या उन्माद आहे, त्यामुळे हिंदू समाजातील लोकांना धीर देण्यासाठी ताकद देण्यासाठी मी इथं आलो आहे. हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे,  हिंदूंच्या ताकदीने हे सरकार स्थापन झालं आहे. या सरकारच्या काळात हिंदुवर झालेला अन्याय सहन करणार नाही, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला आहे.  दरम्यान सध्या राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी म्हटलं की,  ‘पीर बाबाची नाटकं कशाला पाहिजेत? पैगंबर यांना मानणारा मुळ मुस्लिम जमाज देखील पीर बाबाला मानतो का? वक्फ बोर्डाचा विषय आमच्याकडे आहे. ही आमची राज्य सरकार व केंद्र सरकारची भूमिका आहे’, असं राणे यांनी म्हटलं आहे.

लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र काही दिवासंपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं होतं. मात्र या मागणीला विरोध होत आहे, यावर देखील नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र दिलं आहे. सरकार आमचं आहे, सरकारचा मी प्रतिनिधी आहे. आमचा कारभार हा पारदर्शक व्हावा असा आमचा प्रयत्न असल्याचं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. बांगलादेशी कीड देशात ठेवणार नाही, त्यांना जे दूध पाजणारे आहेत, त्यांनाही आम्ही ठेचू असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.