AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ : चंद्रकांत पाटील

गणेशोत्सवानिमित्त मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 दरम्यान मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ : चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Aug 30, 2019 | 7:49 AM
Share

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 दरम्यान मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत याविषयी घोषणा केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “यावेळी पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र, तरीही गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी, रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ काम सुरू आहे. ते तात्काळ पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर मुंबई-कोल्हापूर मार्गे जाणाऱ्यांना टोल माफ करण्यात येईल.”

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर डायव्हर्जन बोर्ड, रोड स्ट्रीप्स, अपघाताबाबत सावध करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्यात आले आहेत. याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील 143 किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. 208 किमीचे रस्ते सुस्थितीत असून 14.60 किमीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. तेही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. सायन-पनवेल, खारपाडा, इंदापूर अशा विविध रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ दुरूस्ती अनेक ठिकाणी सुरू आहे. तसेच पुलावरही दुरूस्तीचे काम सुरू आहे. गणपतीपूर्वी सर्व रस्ते सुरळीत होतील, असंही पाटील यांनी म्हटलं.

सोमवारी (26 ऑगस्ट) मंत्रालयात गणेशोत्सवापूर्वी ट्रॅफिक नियोजनासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला चंद्रकांत पाटील यांच्यासह उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी. पी. जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव सगणे आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.