AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता या लोकांना विधानभवनात प्रवेश बंद म्हणजे बंद, कालच्या राड्यानंतर नार्वेकरांचा मोठा निर्णय

गुरुवारी विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला होता, पडळकर आणि आव्हाड समर्थक एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं, या गोंधळानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे.

आता या लोकांना विधानभवनात प्रवेश बंद म्हणजे बंद, कालच्या राड्यानंतर नार्वेकरांचा मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2025 | 3:36 PM
Share

गुरुवारी विधानसभेच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला, भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांना भिडले, प्रकरण शिविगाळ आणि मारहाणीपर्यंत पोहोचलं. हा राडा चक्क विधानभवनाच्या लॉबीमध्ये झाल्यानं आता या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून घेण्यात आली आहे. या राड्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आमदारांना चांगलंच सुनावलं आहे, तसेच मोठा निर्णय घेतला आहे.

राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

या अप्रिय घटनेनंतर मी सर्व आमदारांना सांगत आहे, विधीमंडळाची परंपरा जपण्याचे उत्तरदायित्त्व हे आमदारांचे आहे. आमदारांचे वर्तन हे विधीमंडळाची प्रतिमा उंचावणारे असावे अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच काही नियम पाळणे गरजेचे आहे.  म्हणूनच लोकसभेच्या धर्तीवर नितीमूल्य समिती गठीत केली जाईल,  याबाबतचा निर्णय एका आठवड्यात घेतला जाईल, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापुढे आता विधानभवनात अभ्यांगतांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांत आमदारांचे वर्तन हे चिंतेची बाब आहे, आमदारकीची शपथ घेताना आपण संविधानाबाबत दे बोलतो ते गांभीर्याने पालन करण्याची गरज आहे. म्हणून यापुढे फक्त आमदार व त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यकांनाच विधानभवनात प्रवेश दिला जाईल, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

तसेच  बहुतेक वेळा मंत्री विधीमंडळात बैठक घेतात,  पण आता मंत्र्यांनीही त्यांच्या बैठका मंत्रालयात घेण्याच्या सूचना देत आहे. अपवादात्मक परिस्थितीत बैठक घेतली तर अभ्यांगतांना प्रवेश दिला जाणार नाही, असंही यावेळी नार्वेकर म्हणाले आहेत.

दरम्यान यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे.  मी सभागृहात एकटाच येतो, मी कुणाच्या पासवर सही करत नाही, चुकीचे रेकॉर्ड वर येऊ नये. मी घटना घडली तेव्हा सभागृहात नव्हतो. माझा घटनेशी कुठलाही संबंध नाही. मी कुणाला खुनावले ही नाही. या लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही जीवंत आहे. मी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे. मला धमक्या येत होत्या हे मी काल सांगितले, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.