AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad | सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग जाम ,संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको, ईट ते गिरवली रस्त्यावर आंदोलन

या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात लहान - मोठे अपघात होत आहेत . रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली असतानाही मागील तीन वर्षांपासून मजबुतीकरणाचे नाव घेतलेले नाही .

Osmanabad | सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग जाम ,संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको, ईट ते गिरवली रस्त्यावर आंदोलन
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 07, 2022 | 12:24 PM
Share

उस्मानाबादः ईट ते गिरवली रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी सोलापूर औरंगाबाद (Solapur Aurangabad high way) राष्ट्रीय महामार्ग जाम केला आहे. संतप्त गावकऱ्यांनी रस्ता रोको (Rasta Roko) केला असून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. उपमुख्य मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निधी देऊन देखील काम निकृष्ट होते असल्याने गावकरी संतप्त आहेत. संतप्त गावकऱ्यांनी रस्ता रोको सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ झाली. निकृष्ट काम करणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ही मागणी केली आहे. या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने नागरिक संतप्त आहेत.हा रस्ता उच्च प्रतीचा सिमेंट काँक्रीटचा करण्यात यावा, अन्यथा उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्या कार्यालयासमोर सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन उपोषणास बसण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

भूम तालुक्यातील ईट ते गिरवली फाटा हा औरंगाबाद सोलापूर महामार्गाला जोडणारा रस्ता आहे त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक असते . सध्या याच मार्गावरून ऊसाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अगोदरच खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या या रस्त्यावर आता काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत खड्डे पडले आहेत. विकासाची स्वप्नं दाखविलेले लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र ग्रामस्थांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहायला तयार नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा ईट ते गिरवली फाटा हा 10 ते 11 किलोमीटर अंतराचा प्रमुख जिल्हा मार्ग आहे या मार्गाची ऊस वाहतुकीला सुरुवात होण्यापूर्वीच अक्षरशः चाळण झाली होती असे असतानाच आता या खड्डेमय रस्त्यावरून भीमाशंकर शुगर चौसाळा , भैरवनाथ शुगर , वाशी धाराशिव साखर कारखाना , चोराखळी शंभू महादेव शुगर , सावरगाव या कारखान्यांसाठी ऊस वाहून नेणारी वाहने मोठ्या संख्येने धावत आहेत . त्यामुळे हा रस्ता आणखी धोकादायक बनला आहे .

खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ

त्यावर चक्क गुडघ्यापर्यंत लहान खड्डे पडले आहेत . या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात लहान – मोठे अपघात होत आहेत . रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली असतानाही मागील तीन वर्षांपासून मजबुतीकरणाचे नाव घेतलेले नाही . तीन वर्षांच्या कालावधीत केवळ दोनवेळा रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली मात्र , ही मलमपट्टीही फार काळ टिकली नाही . जैसे थे झाले त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे .

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....