AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola Crime | पाण्यात युरिया टाकून प्राण्यांची शिकार!, 15 वन्यप्राण्यांचा जीव गेला, अकोल्यात तीन जणांची टोळी वनविभागाच्या जाळ्यात

तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडं युरियाचं पोतं सापडलं. रक्तानं भरलेला सुराही सापडला. शिवाय कुऱ्हाड, कोयता असे शस्त्र जप्त करण्यात आले. हे शिकारी प्राण्यांचे मांस विकायचे. तसेच कातड्याचीही विल्हेवाट लावायचे.

Akola Crime | पाण्यात युरिया टाकून प्राण्यांची शिकार!, 15 वन्यप्राण्यांचा जीव गेला, अकोल्यात तीन जणांची टोळी वनविभागाच्या जाळ्यात
अकोल्यात तीन जणांची टोळी वनविभागाच्या जाळ्यात
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jun 11, 2022 | 2:36 PM
Share

अकोला : जिल्ह्यातल्या आलेगाव सर्कलमध्ये पाण्यात युरिया टाकून वन्य प्राण्यांची शिकार केली जात होती. ही शिकार करणाऱ्या टोळीला वन विभागाने (Forest Department) अटक केली आहे. ही टोळी पाण्यात युरिया टाकून ठेवायची. हे पाणी प्राण्यांनी पिल्याने त्यांचा मृत्यू व्हायचा. युरियाचं पाणी पिल्याने आतापर्यंत 15 ते 16 माकडांची व रोही ( नीलगाय ) आणि काळवीट याची शिकार केली आहे. याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी लगेच त्या ठिकाणी जाऊन तिघांना अटक केली. त्यांच्याकडून युरियाचं पोत, रक्ताने भरलेली सुरी, कोयता, कुऱ्हाड, रक्ताने भरलेलं लाकूड असे साहित्य जप्त केले. ही टोळी प्राण्यांची शिकार (Animal Hunting) करून त्याचे मांस व कातडे विकायचे. या टोळीचा वन विभागाने पर्दाफाश केला. त्यांना पातूर ( Pathur) येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण

आलेगाव सर्कलमध्ये माकडांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर आली. हे मृत्यू कशानं होत आहेत. याचा शोध वनविभागानं घेतला. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. पाण्याअभावी हे मृत्यू होत नव्हते. माकडं मृतावस्थेत सापडत होते. बाजूला शोध घेतला असता. पाणी पिल्यानंतर ते मृ्त्यूमुखी पडत असल्याची बाब समोर आली. कारण त्या पाण्यामध्ये युरिया मिक्स केला जात होता.

अशी केली कारवाई

ही गंभीर बाब असल्याचं वनविभागाच्या लक्षात आलं. याप्रकरणी चौकशी करण्यात आली. तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडं युरियाचं पोतं सापडलं. रक्तानं भरलेला सुराही सापडला. शिवाय कुऱ्हाड, कोयता असे शस्त्र जप्त करण्यात आले. हे शिकारी प्राण्यांचे मांस विकायचे. तसेच कातड्याचीही विल्हेवाट लावायचे. या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जण यात लिप्त असल्याची शक्यता आहे. वनविभागाचे कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. रोही, काळवीटाची शिकार करून त्यांचे मांस विकले जात होते. शिवाय त्यांचे चांभडे विकले जात होते. वन्यप्राण्यांच्या जीवावर उठणाऱ्यांना आता कैदेत दिवस काढावे लागतील.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल