AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीकाठच्या वढोली गावात आढळले मगरीचे पिल्लू, युवकांनी दिले जीवदान…

दिवाण गोचे यांच्या शेतात मगरीचे पिल्लू आढळल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावातील सूरज दीवाण गोचे, सूरज केळझरकर ,समीर विरुटकर यांनी पावडयाच्या सहाय्याने पिलाला स्टीलच्या डब्यात सुरक्षित पकडून शेताच्या लगत वाहणाऱ्या इरई नदित सोडून देत जीवदानच दिले आहे.

Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीकाठच्या वढोली गावात आढळले मगरीचे पिल्लू, युवकांनी दिले जीवदान...
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 10:03 AM
Share

चंद्रपूर : मागील 15 दिवसांपासून चंद्रपूर जिल्हयात (Chandrapur District) सर्वत्र मूसळधार पाऊस सुरुयं. नदी, नाले दुथडी भरून वाहु लागले आहेत. नदीकाठ परिसरात पूर (Flood) परिस्थिति निर्माण झालीयं. यामुळे अनेक प्राण्यांना आपल्या अधिवासापासून दूर व्हावे लागले. अशातच आज वढोली गावातील दिवाण गोचे यांच्या शेतात रोवणीचे काम सुरु असताना त्यांना एक मगरीचे (Crocodile) छोटे पिल्लू आढळून आले. यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नद्यांना पूर आल्याने मगरी वाहून येत आहेत. यापूर्वी परिसरात असा घटना घडल्याचे कळते आहे.

दिवाण गोचे यांच्या शेतात आढळले मगरीचे पिल्लू

दिवाण गोचे यांच्या शेतात मगरीचे पिल्लू आढळल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावातील सूरज दीवाण गोचे, सूरज केळझरकर ,समीर विरुटकर यांनी पावडयाच्या सहाय्याने पिलाला स्टीलच्या डब्यात सुरक्षित पकडून शेताच्या लगत वाहणाऱ्या इरई नदित सोडून देत जीवदानच दिले आहे. इरई नदीला पूर आल्याने अनेकदा परिसरात मगरी आढळून येतात. नदीच्या पाण्याचा जोर वाढल्याने आश्रयासाठी प्राणी शेतात येतात.

चंद्रपूर जिल्हात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच

चंद्रपूर जिल्हात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यातील नद्यांनी पात्र सोडले आहे. इरई नदीत पाणीपातळी वाढून लागली आहे. सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मागील 15 दिवसांपासून चंद्रपूर जिल्हयात सतत पाऊस सुरूयं. अनेक नद्यांना पूर देखील आलायं. नदीकाठ परिसरात पुरस्थिति आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.