AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | गंगापूर धरणातून 3486 तर दारणामधून 7244 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू, धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच!

पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर आणि दारणासह इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलायं. गंगापूर धरणातून 3486 तर दारणामधून 7244 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुतोंडया मारुतीच्या कमरेखाली सध्या पाणी आहे. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिर अद्यापही पाण्याखालीच बघायला मिळतायंत.

Nashik | गंगापूर धरणातून 3486 तर दारणामधून 7244 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू, धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच!
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 9:33 AM
Share

नाशिक : नाशिकच्या (Nashik) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून सध्या 3400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी पुन्हा वाढायला सुरुवात झालीयं. पावसाचा (Rain) जोर कायम राहिल्यास यंदाच्या मोसमात चौथा पूर गोदावरीला येऊ शकतो. यामुळे गोदावरी परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देखील देण्यात आलायं. यामुळे नद्यांना पूर (Rivers flood) येण्याची देखील शक्यता आहे. धरणक्षेत्रात पुन्हा संततधार पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढू शकतो.

पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर आणि दारणासह इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलायं. गंगापूर धरणातून 3486 तर दारणामधून 7244 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुतोंडया मारुतीच्या कमरेखाली सध्या पाणी आहे. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिर अद्यापही पाण्याखालीच बघायला मिळतायंत. गोदावरी आणि दारणा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलायं.

गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे नाशिक जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो

गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे नाशिक जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो झाली असून यंदाच्या वर्षीच्या पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. जून महिन्यात नाशिक जिल्हात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता, यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट होते. परंतू जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. गंगापूर धरणातून 3486 तर दारणामधून 7244 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर देखील आलायं. इतकेच नाही तर गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.