AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBM6: अरे देवा.. तो पुन्हा बिग बॉसच्या घरात..; राकेश बापटबद्दल काय म्हणाली पूर्व पत्नी?

अभिनेता राकेश बापट सध्या 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून त्याची पूर्व पत्नी रिधी डोग्राने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राकेश आणि रिधी यांनी लग्नाच्या सात वर्षांनंतर 2019 मध्ये घटस्फोट घेतला होता.

BBM6: अरे देवा.. तो पुन्हा बिग बॉसच्या घरात..; राकेश बापटबद्दल काय म्हणाली पूर्व पत्नी?
Raqesh Bapat and Ridhi DograImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 11, 2026 | 9:30 AM
Share

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खेळतोय. राकेशने याआधी बिग बॉस हिंदीमध्येही भाग घेतला होता आणि त्यानंतर आता तो मराठीतही चांगला खेळ खेळताना दिसतोय. राकेशची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री रिधी डोग्राला नुकतंच इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतरही राकेश आणि रिधी यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. याच मैत्रीखातर तिने राकेशला कायम पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय.

काय म्हणाली रिधी डोग्रा?

“मला राकेशचा खूप अभिमान आहे. तो जबरदस्त परफॉर्म करतोय. आम्हाला आणि मला त्याची खूप काळजी वाटत होती की, अरे देवा.. तू पुन्हा बिग बॉसच्या घरात जात आहेस. पण यावेळी तो खूप छान कामगिरी करतोय. तो जसा आहे तसाच तिथे वागतोय. आम्हाला जो राकेश माहीत आहे, तोच तिथे दिसतोय. मला खूप आनंद आहे की तो स्वत:च्या नियमांनुसार खेळ खेळतोय. राकेशला माझ्याकडून शुभेच्छा आहेतच, पण यावेळी त्याला अशा वेगळ्या पाठिंब्याची विशेष गरज वाटत नाही. तरीसुद्धा मी नेहमीच त्याच्यासाठी चिअर करत राहीन,” अशा शब्दांत रिधी व्यक्त झाली.

View this post on Instagram

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

“राकेश माझा पूर्व पती असला तरी मला एखादी समस्या सतावत असेल तर मी त्याची मदत आवर्जून घेते. तो माझा पूर्व पती असला तरी माझा सर्वांत जवळचा मित्रसुद्धा आहे”, असं रिधीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. राकेश आणि रिधी यांनी 2019 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एका मालिकेदरम्यान या दोघांची भेट झाली होती आणि सेटवर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.