AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबार जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले; वर्षभरात अपघातात 207 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या उपाययोजना काय?

नंदुरबार जिल्ह्यातील खराब आणि अपुऱ्या कामामुळे अपघाताचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. यावर नियंत्रण केव्हा मिळेल, हा प्रश्नच आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले; वर्षभरात अपघातात 207 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या उपाययोजना काय?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 06, 2022 | 1:39 PM
Share

नंदुरबार : जिल्ह्यात मागील वर्षात जिल्ह्यात 207 नागरिकांना अपघातामध्ये (207 civilians in the accident) जीव गमवावा लागला आहे. अपघात कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या (Police administration) वतीने उपाययोजना करण्यात आल्यात. मात्र, महामार्ग आणि पीडब्ल्यूडी विभाग फक्त नावाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातून (From Nandurbar district) जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग मात्र या महामार्गाची अत्यंत परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र पोलीस प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.

300 पेक्षा अधिक मद्यपींवर कारवाई

पोलीस विभागाने दिलेले माहितीनुसार जिल्ह्यात 2021 या वर्षात 275 अपघात झालेत. त्यात 207 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर 360 लोकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. पोलीस दलाच्या वतीने अपघात स्थळाचा अभ्यास करण्यात आला. त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अनेक अपघातात वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे समोर आले. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात 300 पेक्षा अधिक मद्यपी चालकांवर परवाना रद्द करण्याची कारवाई पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली.

अपघातातील महत्त्वाचे मुद्दे

नंदुरबार जिल्ह्यात सन 2021 मध्ये झालेल्या अपघातांची संख्या – 275 इतकी आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या – 207 इतकी, तर गंभीर जखमी झालेल्यांची संख्या – 360 इतकी आहे. अपघात स्थळाचा अभ्यास करून त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तीनशेपेक्षा अधिक चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. नंदुरबार जिल्ह्यातील खराब आणि अपुऱ्या कामामुळे अपघाताचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. यावर नियंत्रण केव्हा मिळेल, हा प्रश्नच आहे.

Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?

Nagpur | एका सुरेल युगाचा अंत; लतादीदींच्या निधनावर डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला शोक

नागपुरातील रस्त्यांच्या सफाईसाठी मेकॅनिकल रोड स्विपिंग मशीन; रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली