AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर महापौरपदासाठी सेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे या महापौर पदाच्या उमेदवार आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत. येत्या 30 जूनला अहमदनगर महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे

अहमदनगर महापौरपदासाठी सेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
अहमदनगर महापालिका
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 26, 2021 | 10:58 AM
Share

अहमदनगर : अहमदनगर महापौर पदासाठी शिवसेना सोमवारी (28 जून) अर्ज दाखल करणार आहे. शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सेनेकडे महापौरपद, तर राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. येत्या 30 तारखेला महापौरपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेसची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Ahmednagar Mayor Election Shivsena NCP Formula Decided)

शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीगाठी

अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपचा महापौर आहे. अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले होते. गेल्या महिन्यात अहमदनगरमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे.

अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना- 23 राष्ट्रवादी-18 भाजप-15 काँग्रेस-5 बसपा-4 सपा-1 अपक्ष-2

2018 मध्ये अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीत काय घडलं होतं?

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत 2018 मध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले होते. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली होती. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळालं होतं. कारण भाजपवासी सासरे शिवाजी कर्डिलेंना राष्ट्रवादीवासी जावई संग्राम जगताप यांनी मदत केली होती.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

सांगली, जळगावप्रमाणे भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार?

(Ahmednagar Mayor Election Shivsena NCP Formula Decided)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली