AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट, अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाला महिनाभरात दुसरा धक्का

अवकाळी पावसात एका तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. बाळापूर तालुक्यातील सातरगाव शेत शिवारातून घरी परत येत असताना 30 वर्षीय रविंद्रसिंग चव्हाण याच्या अंगावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मुत्यू झाला आहे.

अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट, अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाला महिनाभरात दुसरा धक्का
Ravindra Singh Chavan
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 1:38 PM
Share

अकोला: अकोला जिल्हातील बाळापूर तालुक्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसात एका तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. बाळापूर तालुक्यातील सातरगाव शेत शिवारातून घरी परत येत असताना 30 वर्षीय रविंद्रसिंग चव्हाण याच्या अंगावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मुत्यू झाला आहे.

महिन्यात कुटुंबाला दोन धक्के

बाळापूर येथील औरगपुरा भागात राहणारे चतुरसिंग चव्हाण यांना दोन मुले रविंद्रसिंग आणि मुकेशसिंग यांच्यासह एक विवाहीत मुलगी आहे. सातरगांव येथे त्यांची 2 एक्कर बागायती शेती आहे. शेतातील काम संपवून घरी येत असताना मंगळवारी 2 ते 3 च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली ,त्यामुळे रविंद्सिंग ने झाडाखाली सहारा घेतला असता झाडावर वीज झाडावर वीज पडली. यात झाडाखाली उभा असलेला रविंद्सिंग याच्याही अंगावर वीज पडल्याने रवींद्रचा जागीच मृत्यू झाला.

एक महिन्यापूर्वी पुण्यात कार अपघातात रवींद्रसिंग च्या लहाण्या भावाचा मृत्यू झाला होता,आणि आज रवींद्रचा मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे या बाबत शहरात हळहळ होत आहे.

अकोल्यात मंगळवारी गारपीट

अकोल्यात मंगळवारी अचानक आलेल्या जोरदार वारा आणि पाऊस व गारपीटमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील डाबकी रोडवरील नालीचे पाणी रोडवर आल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते.तर या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांची तारांमबळ उडाली असून,बाहेर ठेवलेलं धांन्य वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. तर, जोरदार वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानामधील झाड बाहेर रोडवर उभ्या असलेल्या टमटम वर पडल्याने टमटम मातीत अडकलं होतं. अचानक पावसामुळे पुन्हा शेतकरी संकटात सापडला असून, हरभरा,तूर आणि गहू पिकाचे नुकसान होण्याची श्यक्यता आहे.

इतर बातम्या:

Rajesh Tope on School : अहमदनगरच्या शाळेत कोरोनाचा भडका, मुख्यमंत्री टास्क फोर्स शाळांबाबत निर्णय घेणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न

इतर बातम्या:

Akola Farmer Ravindrasingh Chavan died due lightening strike in unseasonal rain

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.