AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला; नितीन देशमुख अटक प्रकरणी अमोल मिटकरी यांचा घणाघात

आमदार अमोल मिटकरी म्हणतात की, जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार हे अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली. सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे.

...आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला; नितीन देशमुख अटक प्रकरणी अमोल मिटकरी यांचा घणाघात
| Edited By: | Updated on: Apr 20, 2023 | 4:58 PM
Share

अकोला : खाऱ्या पाण्याचा प्रश्न घेऊन अकोल्यावरुन नागपूरला निघालेली आमदार नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवरंच थांबवण्यात आली. नागपूर पोलीस आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना डिटेन करुन अकोल्याच्या दिशेनं घेऊन निघालेत. आम्हाला नागपूर पोलिसांनी डिटेन केलंय. आत्ताच कळलं की ते अकोला येथे घेऊन जात आहे. पण आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. सरकारने जर आठ दिवसांत निर्णय घेतला नाही. तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार, असा इशारा  नितीन देशमुख यांनी दिला.

सैतानी साम्राज्याचा उदय

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूरजवळ अटक करण्यात आली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणतात की, जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार हे अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली. सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे. याच जितजागत उदाहरण आज अकोला ते नागपूरपर्यंत पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख.

देशमुख यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली. त्यावरून पाहायला मिळाला आहे. त्यामुळेही सैतानी साम्राज्याची उदय आहे. असा टोला आज अमोल मिटकरी यांनी नितीन देशमुख यांच्या अटकेवर सरकारला लागला आहे.

तेव्हापासून लोकशाही संपली

अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार आलं. तेव्हापासून महाराष्ट्रातील लोकशाही संपली आहे. सैतानी साम्राज्याचा उदय झाला. नितीन देशमुख यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे. देशमुख यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष यात्रा काढली.

गृहमंत्री दडपण टाकतात. पोलीस देशमुख यांना माघारी पाठवतात. देशमुख यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे प्रकार सुरू होतात. बेकायदेशीररीत्या देशमुख यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी वागणूक दिली जाते, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय.

याची परतफेड महाविकास आघाडी करणार

शिवसैनिकांना अमानुषपणे वागवलं जातं. अशा घटना सैतानी साम्राज्याचा उदय आहे. महाराष्ट्रात लोकशाही शिल्लक असेल असं मला वाटत नाही. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात. उद्या महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर याची परतफेड केल्याशिवाय महाविकास आघाडी शांत बसणार नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.