AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला; नितीन देशमुख अटक प्रकरणी अमोल मिटकरी यांचा घणाघात

आमदार अमोल मिटकरी म्हणतात की, जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार हे अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली. सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे.

...आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला; नितीन देशमुख अटक प्रकरणी अमोल मिटकरी यांचा घणाघात
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 20, 2023 | 4:58 PM
Share

अकोला : खाऱ्या पाण्याचा प्रश्न घेऊन अकोल्यावरुन नागपूरला निघालेली आमदार नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवरंच थांबवण्यात आली. नागपूर पोलीस आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना डिटेन करुन अकोल्याच्या दिशेनं घेऊन निघालेत. आम्हाला नागपूर पोलिसांनी डिटेन केलंय. आत्ताच कळलं की ते अकोला येथे घेऊन जात आहे. पण आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. सरकारने जर आठ दिवसांत निर्णय घेतला नाही. तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार, असा इशारा  नितीन देशमुख यांनी दिला.

सैतानी साम्राज्याचा उदय

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूरजवळ अटक करण्यात आली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणतात की, जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार हे अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली. सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे. याच जितजागत उदाहरण आज अकोला ते नागपूरपर्यंत पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख.

देशमुख यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली. त्यावरून पाहायला मिळाला आहे. त्यामुळेही सैतानी साम्राज्याची उदय आहे. असा टोला आज अमोल मिटकरी यांनी नितीन देशमुख यांच्या अटकेवर सरकारला लागला आहे.

तेव्हापासून लोकशाही संपली

अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार आलं. तेव्हापासून महाराष्ट्रातील लोकशाही संपली आहे. सैतानी साम्राज्याचा उदय झाला. नितीन देशमुख यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे. देशमुख यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष यात्रा काढली.

गृहमंत्री दडपण टाकतात. पोलीस देशमुख यांना माघारी पाठवतात. देशमुख यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे प्रकार सुरू होतात. बेकायदेशीररीत्या देशमुख यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी वागणूक दिली जाते, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय.

याची परतफेड महाविकास आघाडी करणार

शिवसैनिकांना अमानुषपणे वागवलं जातं. अशा घटना सैतानी साम्राज्याचा उदय आहे. महाराष्ट्रात लोकशाही शिल्लक असेल असं मला वाटत नाही. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात. उद्या महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर याची परतफेड केल्याशिवाय महाविकास आघाडी शांत बसणार नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार