AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: कंगनाचं संरक्षण आणि पुरस्कार पाहून गोखलेंनाही ‘पद्मश्री’ व्हायचंय दिसतंय; बाळासाहेब थोरातांचा जोरदार टोला

देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो. संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळालं. तिचं संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून अभिनेते विक्रम गोखलेंनाही पद्मश्री व्हायचं दिसतंय.

VIDEO: कंगनाचं संरक्षण आणि पुरस्कार पाहून गोखलेंनाही 'पद्मश्री' व्हायचंय दिसतंय; बाळासाहेब थोरातांचा जोरदार टोला
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 12:55 PM
Share

नगर: देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो. संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळालं. तिचं संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून अभिनेते विक्रम गोखलेंनाही पद्मश्री व्हायचं दिसतंय, असा चिमटा काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढला.

नगर येथील एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना रणावत, अभिनेते विक्रम गोखले आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. कंगना म्हणते स्वातंत्र्य ही भीक आहे. 2014 साली खरं स्वातंत्र्य मिळालं. कसलं स्वातंत्र्य मिळालं? हे बोलणं वेडेपणाचं आहे. त्यावर बोलण्यात अर्थ नाही. कुणी तरी बोलायचं मग लगेच त्यांना संरक्षण मिळतं. 40 बॉडिगार्ड उभे राहतात. जो वादग्रस्त बोलला त्याला त्रास होऊ नये म्हणून संरक्षण दिलं जातं. पुढे लगेच पद्मश्री मिळते. असं पाहिल्यानंतर विक्रम गोखले नावाचे गृहस्थ बोलायला लागले. त्यांनाही पद्मश्री व्हायचं दिसतंय. याचा अर्थ कसं बोला कसं वागा ते चालतं, अशी टीका थोरात यांनी केली.

जगात गांधींच्या नावानेच चळवळी होतात

स्वातंत्र्यासाठी काहींचा त्याग झाला घरावर नांगर फिरला. स्वातंत्र्य सहज मिळालं नाही. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या विचारामुळेच स्वातंत्र्य मिळाले. अनेकजण शहीद होत होते. एकजुटीने पुढे येऊन अंगावर गोळ्या झेलत होते. इतकी प्रेरणा त्यांना गांधी विचारातून मिळाली होती. आजही जगात जिथे जिथे चळवळ चालते तिथे तिथे महात्मा गांधींचं नाव घेऊन चळवळ चालते, असं सांगतानाच ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार कुणाला नाहीये. ते राष्ट्रपिताच आहेत. त्यांना विचाराने संपू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच त्यांच्यावर टीका केली जातेय, असं ते म्हणाले.

यामागे कोणता मेंदू?

आज स्वातंत्र्यावर बोलले. स्वातंत्र्य चळवळीवर बोलले. स्वातंत्र्य बोगस असल्याचं विधान केलं. उद्या ते राज्यघटनेवरही बोलतील. आता म्हणतील राज्यघटना बोगस आहे. गरीबांना मतांचा अधिकार नको. कशाला हवा त्यांना मतांचा अधिकार. त्यांची दिशा पाहा, सर्व तुमच्या लक्षात येईल. हे बोलणं सहज नसतं. कोणी तरी मेंदू यामागे काम करत असतो, असा दावा त्यांनी केला.

राज्यघटनेनुसारच देश चालवावा लागेल

हळूहळू ते आपल्या राज्यघटनेवर येऊन पोहोचले तर आश्चर्य मानण्याचं कारण नाही. जेव्हा ते राज्यघटनेवर येतील तेव्हा आपण जे कष्टाने मिळवलं ते सर्व गमावून बसू. नागरिकत्वाच्या तपासण्या अमूकतमूक हे विषय त्यांनी हातात घेतले होतेच. आता नव्या पद्धतीने ते समोर येत आहेत. धर्माचे नाव घेतल्यावर लोक मतदान करतात हे त्यांच्या पक्कं लक्षात आहे. मतं घ्यायचे आणि वाटेल तसं वागायचं हे चालू आहे. एकट्याचीच सत्ता आणायची. बाकी कोणी नको हे सुरू आहे. पण हा देश राज्यघटनेनुसारच चालवावा लागेल हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

VIDEO: एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

Rajastan Cabinet Reshuffle: आमच्या पक्षात दुफळी नाही, नेतृत्वाने योग्य पाऊलं घेतली, दलित चेहऱ्यांनाही जागा- सचिन पायलट

VIDEO: फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण पदासाठी हात फैलावणार नाही; पंकजा मुंडेंची खदखद उघड

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष