AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळमध्ये दरवर्षी जीर्ण पुलामुळे संपर्क तुटतो, अखेर गावकऱ्यांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात धाव

यवतमाळ जिल्ह्यातील बामर्डा गावाला जोडणारा पुल गेल्या 2 वर्षापासून जीर्ण होऊन खचलाय. दरवर्षी या गावाचा संपर्क तुटतो आणि त्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

यवतमाळमध्ये दरवर्षी जीर्ण पुलामुळे संपर्क तुटतो, अखेर गावकऱ्यांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात धाव
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 20, 2021 | 6:54 AM
Share

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील बामर्डा गावाला जोडणारा पुल गेल्या 2 वर्षापासून जीर्ण होऊन खचलाय. दरवर्षी या गावाचा संपर्क तुटतो आणि त्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाशी भेटून आपली समस्या मांडली परंतु त्यांच्याकडून कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. यंदाही तिच स्थिती उद्भवत असल्यानं आता या गावकऱ्यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेच दाद मागितली आहे (Bamarda village from Yavatmal complaint about damage bridge to National Human Rights Commission).

गावातील शेतकऱ्यांना या मार्गावरून जाण्या-येण्यासाठी अनेक अडचणी

बामर्डा गावाचा पावसामुळे याआधी पूर येऊन अनेकदा जनसंपर्क तुटला. जीर्ण झालेल्या या पुलाचे खोलीकरण कमी असल्याने पूर केव्हा येईल हे सांगताच येत नाही. सध्या शेतातील कामाची लगबग, पेरणीचा हंगाम सुरु झाल्याने गावातील शेतकऱ्यांना या मार्गावरून जाण्या येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना हातचे काम बुडवून पुलात अडकलेली पुराण काढण्यासाठी आपला वेळ द्यावा लागत आहे.

शाळा, दवाखाना व मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी याच पुलाचा वापर

शाळा, दवाखाना व मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना याच पुलाचा वापर करावा लागतो. पण अशी परिस्थिती दरवर्षी उद्भवत असल्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाशी भेटून आपली समस्या मांडली परंतु त्यांच्याकडून कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. म्हणून या समस्येबाबत थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात तक्रार करण्यात आली आहे.

बाम्बर्डा गावचे विधी अभ्यासक धनंजय आसुटकर म्हणाले, “आमचा लोकशाही प्रणालीवर विश्वास आहे. म्हणून आम्ही कायदेशीर मार्गाने आमचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण त्यातही विलंब करून आम्हाला आमच्या हक्कांपासून दूर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठे आंदोलन छेडण्यात येईल.”

“खड्डेमुक्त रस्ते, चांगल्या परिस्थितीतील पूल हा मूलभूत अधिकारचाच भाग आहे. या अधिकाराची पूर्तता होत नसून इतरही संबंधित हक्कांची पायमल्ली होत आहे. त्यासाठी न्यायालयीन मार्ग वापरून आपले हक्क मिळवू शकतो. मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रश्नांवर आम्ही बामर्डा येथील गावकऱ्यांना मोफत कायदेशीररीत्या मदत करत आहोत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती पाथ फाउंडेशनचे अॅड. दीपक चटप आणि बोधी रामटेके यांनी दिली.

हेही वाचा :

Video | मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली, रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव, व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद जिल्ह्यात तुफान पाऊस, जुई नदीला पूर, पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प

पनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर

व्हिडीओ पाहा :

Bamarda village from Yavatmal complaint about damage bridge to National Human Rights Commission

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या