AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan : मविआचं सरकार इतिहासातील सर्वाधिक निष्क्रिय, गेंड्यांच्या कातडीचं म्हणल तर गेंड्यालाही लाज वाटेल : गिरीश महाजन

आज पर्यंतच्या इतिहासात अतिशय निष्क्रिय सरकार असून या गेंड्याच्या कातडीचे म्हटलं तर गेंड्याला ही लाज वाटेल, अशी टीका महाजन यांनी केली आहे. इतकं निर्लज्ज सरकार या राज्यात आलेले असल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

Girish Mahajan : मविआचं सरकार इतिहासातील सर्वाधिक निष्क्रिय, गेंड्यांच्या कातडीचं म्हणल तर गेंड्यालाही लाज वाटेल : गिरीश महाजन
Girish Mahajan
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 08, 2022 | 6:56 AM
Share

जळगाव: भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA) टीका केलीय. महाविकास आघाडी सरकार म्हणजे संवेदनाहीन सरकार आहे. आज पर्यंतच्या इतिहासातील अतिशय निष्क्रिय सरकार असून या गेंड्याच्या कातडीचे म्हटलं तर गेंड्याला ही लाज वाटेल, अशी टीका महाजन यांनी केली आहे. इतकं निर्लज्ज सरकार या राज्यात आलेले असल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. नागपूरमधील अतिरेक्यांची रेकी आणि पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या प्रकारावरुन गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. यावेळी भाजप खासदार रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या.

ग्रामीण भागातील रक्तवाहिनी बंद

विद्यार्थी, सामान्य माणसांचे हाल सुरू असून ग्रामीण भागातील रक्तवाहिनी एसटी बंद पडली आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारला काही पडली. विजेचा प्रश्न, नोकर भरतीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, कुणाला काही पडलेले नाही. कोणताही मंत्री आंदोलकांना भेटायला जात नाही. राज्यातील सर्व घटक हे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

अतिरकेी संघटनांचे धाबे दणाणल्यानं नागपूरमध्ये रेकी

नागपूर येथील आरएसएसच्या कार्यलय परिसरात जैश ये मोहमद संघटनेने रेकी केल्याचं समोर आलं आहे. अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले असल्यानं त्यातूनच हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. कलम 370 नंतर हटवल्यानंतर अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले असून यातूनच हा प्रकार झाल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबला गेले असताना सुरक्षेचा जो पोरखेळ झाला ती अतिशय गंभीर बाब आहे. देशाचे पंतप्रधान आहेत. ते ज्यावेळी एखाद्या राज्यात जातात ते देशाचे असतात. काँग्रेस नेत्यांनी बोलायला काही ठेवलेलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

इतर बातम्या:

ZP School | नागपूर जिल्ह्यात दरवर्षी तीनशे इंग्रजी शाळांचे प्रस्ताव; का घटते सरकारी शाळांतील आकडेवारी?

City Bus | नागपूर शहर बसच्या ताफ्यात दाखल होणार इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस; पर्यावरणाला कसा होणार फायदा?

BJP leader Girish Mahajan slam MVA Government and Congress over various issue

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली