AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मी काय महाराष्ट्राचा बिहार केला काय?; गौतमी पाटील कुणावर संतापली?

आयोजकांनी तिकीट लावून बार्शीतील कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं तेव्हाच मी स्टेजवर गेले. त्यात माझं काय चुकलं?, असा सवाल गौतमी पाटील हिने केला आहे.

Video : मी काय महाराष्ट्राचा बिहार केला काय?; गौतमी पाटील कुणावर संतापली?
gautami patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2023 | 7:23 AM
Share

पंढरपूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या भरगच्च कार्यक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंच आहे. गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्लच असतो. त्यामुळे तिची चर्चा होतेच. मात्र, सध्या गौतमी वेगळ्याच अडचणीत सापडली आहे. गौतमीच्या नाशिकच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच होत्या. या कार्यक्रमाला लोक फिरकलेच नाही. तर बार्शीतील कार्यक्रमात गौतमी उशिरा पोहोचली. त्यामुळे आयोजक आणि गौतमीत वादावादी झाली. या दोन्ही गोष्टींमुळे गौतमी चांगलीच चर्चेत आली आहे. या सर्व प्रकरणावर गौतमीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तिने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने छोटा पुढारी घनश्याम दराडे याच्या आरोपाचा समाचारही घेतला. मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?, असा सवाल गौतमी पाटील हिने केला.

मारहाण नको, वाद नको, एन्जॉय करा

नाशिकमध्ये चाहत्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. त्यामुळे ती चाहत्यांवर चांगलीच भडकली. पत्रकारांना धक्काबुक्की होणं चुकीचंच आहे. अशा गोष्टींचा निषेध केलाच पाहिजे, असं सांगतानाच मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी सोडून पुढं जाते. मी असं काय केलंय? मी महाराष्ट्राचा बिहार केला काय? मला याचं उत्तर मिळालंच पाहिजे, असं गौतमी पाटील म्हणाली. मला त्या गोष्टीची माहिती नव्हती. मी कार्यक्रमातून निघाले. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर मला कळलं. वाद घालू नका. कार्यक्रम एन्जॉय करा. कुणाला मारहाण करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

माझी काय चूक होती?

मी कार्यक्रमाला वेळेत गेले होते. कोणत्याही कार्यक्रमात मी वेळेत जाते. जेव्हा आयोजक सांगतात तेव्हाच मी स्टेजवर जाते. आयोजकांनी तिकीट लावून बार्शीतील कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं तेव्हाच मी स्टेजवर गेले. त्यात माझं काय चुकलं? असा सवाल तिने बार्शीतील वादावर केला. कार्यक्रमाची परवानगी रात्री 10 वाजेपर्यंतची होती. कार्यक्रमाची वेळ संपल्यानंतर पोलिसांनी कार्यक्रम बंद करायला सांगितलं. म्हणून आम्ही कार्यक्रम बंद केला, असंही तिने स्पष्ट केलं. माझं लग्न ठरलंय हे मी पेपरातच वाचलंय. पण माझं लग्न ठरलेलं नाहीये. सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. जेव्हा ठरेल तेव्हा नक्कीच सांगेल, असंही ती म्हणाली.

हिशोबच दिला

बार्शी येथील कार्यक्रमात फसवणूक झाल्याचा आरोप करत आयोजक गायकवाड यांनी गौतमी पाटील आणि केतन मारणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुळातच आयोजकाने पोलीस परवानगी काढली नव्हती. शिवाय कार्यक्रमाचे आयोजक गायकवाड हे कार्यक्रमस्थळी वेळेत न आल्याने कार्यक्रम उशिरा सुरु करावा लागल्याचा खुलासा गौतमी पाटीलच्या आयोजकांकडून करण्यात आलाय. याप्रकरणी आता गौतमीच्या आयोजकांकडून बाजू मांडण्यात आलीय.

कार्यक्रमासाठी ठरलेल्या रक्कमेपैकी फक्त पन्नास हजार रुपये आणि व्हॅनिटी व्हॅनसाठी 40 हजार रुपये देण्यात आले. उर्वरित रक्कम येणे बाकी असल्याने यातtन पळ काढण्यासाठी गायकवाड यांनी आरोप करत आहेत. त्यामुळे पोलीस तक्रार दिली आहे, असं गौतमीच्या आयोजकांनी सांगितलं. तर या तक्रारीचं कार्यक्रमाच्या आयोजकांनी खंडन केलं आहे.

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.