AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मी काय महाराष्ट्राचा बिहार केला काय?; गौतमी पाटील कुणावर संतापली?

आयोजकांनी तिकीट लावून बार्शीतील कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं तेव्हाच मी स्टेजवर गेले. त्यात माझं काय चुकलं?, असा सवाल गौतमी पाटील हिने केला आहे.

Video : मी काय महाराष्ट्राचा बिहार केला काय?; गौतमी पाटील कुणावर संतापली?
gautami patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2023 | 7:23 AM
Share

पंढरपूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या भरगच्च कार्यक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंच आहे. गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्लच असतो. त्यामुळे तिची चर्चा होतेच. मात्र, सध्या गौतमी वेगळ्याच अडचणीत सापडली आहे. गौतमीच्या नाशिकच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच होत्या. या कार्यक्रमाला लोक फिरकलेच नाही. तर बार्शीतील कार्यक्रमात गौतमी उशिरा पोहोचली. त्यामुळे आयोजक आणि गौतमीत वादावादी झाली. या दोन्ही गोष्टींमुळे गौतमी चांगलीच चर्चेत आली आहे. या सर्व प्रकरणावर गौतमीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तिने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने छोटा पुढारी घनश्याम दराडे याच्या आरोपाचा समाचारही घेतला. मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?, असा सवाल गौतमी पाटील हिने केला.

मारहाण नको, वाद नको, एन्जॉय करा

नाशिकमध्ये चाहत्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. त्यामुळे ती चाहत्यांवर चांगलीच भडकली. पत्रकारांना धक्काबुक्की होणं चुकीचंच आहे. अशा गोष्टींचा निषेध केलाच पाहिजे, असं सांगतानाच मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी सोडून पुढं जाते. मी असं काय केलंय? मी महाराष्ट्राचा बिहार केला काय? मला याचं उत्तर मिळालंच पाहिजे, असं गौतमी पाटील म्हणाली. मला त्या गोष्टीची माहिती नव्हती. मी कार्यक्रमातून निघाले. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर मला कळलं. वाद घालू नका. कार्यक्रम एन्जॉय करा. कुणाला मारहाण करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

माझी काय चूक होती?

मी कार्यक्रमाला वेळेत गेले होते. कोणत्याही कार्यक्रमात मी वेळेत जाते. जेव्हा आयोजक सांगतात तेव्हाच मी स्टेजवर जाते. आयोजकांनी तिकीट लावून बार्शीतील कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं तेव्हाच मी स्टेजवर गेले. त्यात माझं काय चुकलं? असा सवाल तिने बार्शीतील वादावर केला. कार्यक्रमाची परवानगी रात्री 10 वाजेपर्यंतची होती. कार्यक्रमाची वेळ संपल्यानंतर पोलिसांनी कार्यक्रम बंद करायला सांगितलं. म्हणून आम्ही कार्यक्रम बंद केला, असंही तिने स्पष्ट केलं. माझं लग्न ठरलंय हे मी पेपरातच वाचलंय. पण माझं लग्न ठरलेलं नाहीये. सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. जेव्हा ठरेल तेव्हा नक्कीच सांगेल, असंही ती म्हणाली.

हिशोबच दिला

बार्शी येथील कार्यक्रमात फसवणूक झाल्याचा आरोप करत आयोजक गायकवाड यांनी गौतमी पाटील आणि केतन मारणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुळातच आयोजकाने पोलीस परवानगी काढली नव्हती. शिवाय कार्यक्रमाचे आयोजक गायकवाड हे कार्यक्रमस्थळी वेळेत न आल्याने कार्यक्रम उशिरा सुरु करावा लागल्याचा खुलासा गौतमी पाटीलच्या आयोजकांकडून करण्यात आलाय. याप्रकरणी आता गौतमीच्या आयोजकांकडून बाजू मांडण्यात आलीय.

कार्यक्रमासाठी ठरलेल्या रक्कमेपैकी फक्त पन्नास हजार रुपये आणि व्हॅनिटी व्हॅनसाठी 40 हजार रुपये देण्यात आले. उर्वरित रक्कम येणे बाकी असल्याने यातtन पळ काढण्यासाठी गायकवाड यांनी आरोप करत आहेत. त्यामुळे पोलीस तक्रार दिली आहे, असं गौतमीच्या आयोजकांनी सांगितलं. तर या तक्रारीचं कार्यक्रमाच्या आयोजकांनी खंडन केलं आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.