AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा; नांदेडमधील शेतकऱ्यांचं प्रकरण नेमकं काय?

जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचं डिमार्केशन अतिशय चुकीच्या पद्धतीनं केलं जातंय. हे शहरालगत घेतलेलं आहे. विष्णुपुरी प्रकल्प, पूर्णा नदीचा प्रकल्प अशा ठिकाणाहून हा महामार्ग जात आहे.

शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा; नांदेडमधील शेतकऱ्यांचं प्रकरण नेमकं काय?
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 03, 2023 | 8:28 AM
Share

नांदेड : नांदेड जालना या प्रस्तावित समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास नांदेड शहरालगत असलेल्या बारा गावातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. या रस्त्यासाठी जमिनी संपादित करून त्यांना रेडिरेकनर दराने मोबदला देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात नांदेड शहरालगत असलेल्या या जमिनीचा बाजारभाव कोट्यवधी रुपये आहे. मात्र सरकारकडून अवघे चार ते पाच लाख रुपये प्रति एकर असा भाव देऊन ह्या जमिनी संपादित करण्याचा घाट रचल्या जात आहे. त्यास नांदेड जिल्ह्यातील बारा गावाच्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय. प्रसंगी शेतात सरण रचत आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. त्यामुळे प्रस्तावित नांदेड जालना समृद्धी महामार्गासाठीचे संपादन रखडलंय. जमीन देण्यास विरोध असल्याचं बाभूळगाव आणि किवळाचे शेतकरी म्हणतात.

योग्य मोबदल्याची मागणी

विकासाला आम्ही आड जात नाही. पण, समिती नेमूण चालू भावाप्रमाणे पैसे द्या, असं एका शेतकऱ्यानं म्हटलं. जालन्याकडून येणाऱ्या रस्ता आधी किवड्याकडून होता. त्या जमिनी माळरान खरबाळ होत्या. जमिनी काही जणांनी लग्नाच्या किंवा काही कारणानं विकल्या असतील. त्या एक कोटी रुपयेप्रमाणे विकल्या. पण, आम्हाला फक्त २५ लाख मिळाले आहेत. त्यामुळे योग्य मोबदला दिल्यास जमिनी देण्याचा मानस असल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलं.

रेडिरेकनरचे दर खुपच कमी

जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचं डिमार्केशन अतिशय चुकीच्या पद्धतीनं केलं जातंय. हे शहरालगत घेतलेलं आहे. विष्णुपुरी प्रकल्प, पूर्णा नदीचा प्रकल्प अशा ठिकाणाहून हा महामार्ग जात आहे. याठिकाणी अतिशय सुपिक आणि बागायती जमिनी आहेत. बहुपिकी जमीन आहे. शासन या भागातून महामार्ग काढण्याच्या विचारात आहे. जमिनीचे दर हे रेडिरेकनरप्रमाणे काढले आहेत. गेल्या तीन-चार वर्षात कुठलेही दर वाढलेले नाहीत. बाजारमूल्य दीड ते दोन कोटी रुपये आहे. पण, रेडिरेकनरचा दर हा पाच लाख रुपये एकर आहे. पाच पट मोबदला दिल्यास २५ लाख रुपये होतो. हा मोबदला अतिशय कमी आहे. हा दर परवडनारा नसल्याचंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

Follow Us
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान