AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, मग जे घडले ते भयंकर !

नांदेड जिल्ह्यातील चार तरुण हैदराबादला एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून चौघेही कारने घरी परतत होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, मग जे घडले ते भयंकर !
नांदेडमधील चौघांचा हैदराबादमध्ये कार अपघातात मृत्यूImage Credit source: TV9
| Updated on: Mar 13, 2023 | 7:43 PM
Share

नांदेड / राजीव गिरी : घरगुती कार्यक्रमासाठी हैदराबादला गेलेल्या तरुणांच्या गाडीला नांदेडला परतत असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादहून नागपूरकडे निघालेली भरधाव कार उभ्या असलेल्या कंटेनरच्या खाली घुसल्याने हा भीषण अपघात झाला. निजामाबाद जिल्ह्यात ही घटना घडली. मृतांमध्ये सख्या भावांचा समावेश आहे. गणेश निरडी, आदित्य निरडी, प्रकाश अंकलवार आणि साईराम बाळू सनपरामू अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाटवण्यात आले.

चौघेही नांदेडच्या कुंडलवाडी गावचे रहिवासी

चौघे तरुण नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी गावातील रहिवासी आहेत. चौघेही हैदराबाद येथील येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते कारने परतत होते. निजामाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 44 वर इंदलवाई मंडळातील चंद्रायनपल्ली येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट कंटेनरखाली घुसली.

चौघांचा जागीच मृत्यू

अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचाही चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चौघांचे मृतदेह बाहेर काढत निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तरुणांच्या मृत्यूमुळे कुंडलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तर निरडी कुटुंबातील दोघा भावांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.