AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

महाडच्या तळीये मधलीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली दबलं गेलं आहे. (Raigad Taliye Landslide)

VIDEO: काल इथे गाव होतं... डोंगराच्या आडोशाला गेले आणि...; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर
Mahad landslinde
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 5:44 PM
Share

महाड: महाडच्या तळीये मधलीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली दबलं गेलं आहे. कालपर्यंत डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव अवघ्या 24 तासात मातीच्या ढिगारा बनून राहिलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांचे संसार मातीला मिळाले आहेत. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे. सध्या या परिसरात बचावकार्य सुरू असून मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. ही घटना नेमकी कशी घडली? या दुर्घटनेत किती लोक ठार झाली? आदी प्रश्नांचा प्रत्यक्ष साक्षीदारांच्या हवाल्याने घेतलेला हा मागोवा. (Mahad landslide: A look at how the Taliye Village landslides occurred)

‘टीव्ही9 मराठी’ला सर्वात आधी या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आमची टीम पाऊस अंगावर झेलत आणि चिखल तुडवत तळीये गावात दाखल झाली. गावातील विदारक दृष्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. लोकांचा आक्रोश, मातीचा ढिगारा उपसण्यात येत असलेला अडथळा, घरांवर कोसळलेले दगड आणि मोठं मोठी झाडं… त्यामुळे संपूर्ण गावच ओसाड वाटत होता. आमच्या टीमने काही प्रत्यक्षदर्शींशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यातून मिळाली ती धक्कादायक आणि काळीज पिळवटणारी माहिती.

कामावर गेले ते वाचले

काल गुरुवारी चार साडे चारला ही घटना घडली. पावसामुळे लोक घरात होते. पाऊस जोरात आल्यामुळे लोक घरातून बाहेर पडले नाहीत. नंतर पाऊस कमी झाल्यावर काही लोक घरातून बाहेर पडली. पण पाणी अधिक असल्याने काही लोकांनी त्यातून जाणं टाळलं. या दुर्घटनेत एकूण 30 घरे दबली गेली. अख्खं गाव गेलं. 80-90 लोकं गावात राहत होते. जे कामावर गेले होते तेच शिल्लक राहिले. बाकी सर्व दरडीखाली दबले गेले. आम्ही प्रशासकीय यंत्रणांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण नेटवर्कमुळे संपर्क झाला नाही, असं प्रत्यक्षदर्शी तरुणाने सांगितले.

45 घरांचं गाव, 35 घरे जमीनदोस्त

दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होता. समोरच्या डोंगराचा भाग खाली आला. त्यामुळे गावातील लोक घराबाहेर आले आणि ते दुसऱ्या डोंगराच्या बाजूला आडोशाला उभे राहिले. पण त्यांना काय माहीत काळ इथेच लपून बसला. जीव वाचवण्यासाठी ज्या डोंगराखाली उभे राहिले, त्याच डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगडं पडली, झाडे पडली, मातीचा ढिगारा पडला. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. सर्व गेले. घरेही जमीनदोस्त झाली. त्यामुळे संपूर्ण परिसरात चिखल झाला होता, असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. या गावात 40-45 घरे होती. त्यातील 35 घरे जमीनदोस्त झाली आहेत, असंही त्याने सांगितलं.

जोराचा आवाज आला…

तर दुसऱ्या एका व्यक्तीची बहीण आणि भावोजी या दुर्घटनेत दगावली. भावोजी संपत पोळ आणि बहीण अनिता संपत पोळ यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्याचा भाचा मात्र सुदैवाने बचावला. तो म्हणतो. जोराचा आवाज आला म्हणून गावकऱ्यांची पळापळ झाली. पावसामुळे सर्वजण एकाजागेवर जमा झाले. पाऊस जोराचा येत होता. तेवढ्यात काळाने झडप घातली आणि सर्वजण दरडीखाली दबले गेले, असं त्याने सांगितलं. (Mahad landslide: A look at how the Taliye Village landslides occurred)

संबंधित बातम्या:

Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 38 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

Raigad Satara landslide live : महाड, पोलादपूर आणि साताऱ्यात दरडी कोसळल्या, आतापर्यंत 71 मृत्यू

Raigad Landslide : रायगडला हादरे सुरुच, आता पोलादपूरमध्ये भूस्खलनात 11 जण दगावले, राज्यभरात 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

(Mahad landslide: A look at how the Taliye Village landslides occurred)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.