AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौथ्या दिवशीही तळीयेत 42 लोक गायब; मृतांचा आकडा 43 वर; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याच्या घटनेला आज चार दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही या दुर्घटनेतील 42 जण गायब आहेत. ( Mahad landslinde)

चौथ्या दिवशीही तळीयेत 42 लोक गायब; मृतांचा आकडा 43 वर; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
Taliye Village
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 11:07 AM
Share

महाड: महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याच्या घटनेला आज चार दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही या दुर्घटनेतील 42 जण गायब आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज एसडीआरएफची टीमही तळीयेमध्ये दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 43वर पोहोचल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Maharashtra Rains: Death toll in flood-hit Taliye reaches 43)

तळीये येथे एनडीआरएफने सलग चौथ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. आज एसडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात जेसीबीच्या सहाय्याने मातीचे ढिगारे काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. तळीयेमध्ये आतापर्यंत 42 जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. तर अजूनही 42 जण बेपत्ता आहेत.

नेमकं काय घडलं?

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

राज्यात 99 लोक बेपत्ता

राज्यात पूरग्रस्त भागातून सुमारे हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. एकूण 112 मृत्यू झाले असून 3221 जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर 53 लोक जखमी असून 99 लोक बेपत्ता आहेत. 1,35,313 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. (Maharashtra Rains: Death toll in flood-hit Taliye reaches 43)

संबंधित बातम्या:

Taliye landslide: तळीयेत 35 महिला, 10 मुलांसह 50 जण अजूनही बेपत्ता; जिल्हाधिकारी निधी चौधरी घटनास्थळी

Taliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं

Maharashtra Rain Landslides LIVE | सांगलीकरांनो आणखी पाणी पातळी वाढणार, 10 हजार लोक स्थलांतर

(Maharashtra Rains: Death toll in flood-hit Taliye reaches 43)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.