AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीत कोसळधार, 24 तासात 102 मिमी पाऊस, हवामान विभागाकडून रेड ॲलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसानं दोन हजार मिलीमीटरच्या सरासरीचा आकडा गाठलाय. अजून जुलै महिन्याचे 10 दिवस बाकी असताना 1 जूनपासून आजपर्यत पावसानं 1939 मिलीमीटरचा टप्पा गाठलाय.

रत्नागिरीत कोसळधार, 24 तासात 102 मिमी पाऊस, हवामान विभागाकडून रेड ॲलर्ट
Rain update
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jul 20, 2021 | 1:49 PM
Share

रत्नागिरी: गेल्या आठ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा पहायला मिळतायत. सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं दुपारनंतर पुन्हा एकदा सरींवर कोसळण्यास सुरवात केलीय. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसानं दोन हजार मिलीमीटरच्या सरासरीचा आकडा गाठलाय. अजून जुलै महिन्याचे 10 दिवस बाकी असताना1 जूनपासून आजपर्यत पावसानं 1939 मिलीमीटरचा टप्पा गाठलाय.

24 तासात 102 मिमी पाऊस

गेल्या चौवीस तासात सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात 102 मिलीमीटर झालाय. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यत 1265 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला होता.आजपासून पुढील दोन दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय. दुपारानंतर सरींवर पाऊस कोसळतोय. गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहतायत.

अर्जुना धरणाचा उजा कालवा फुटला

राजापूर तालुक्यातील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला आहे. धोधो कोसळणाऱ्या कालवा तुडूंब भरला आणि तो खुटून वाहू लागला. मुख्य बाब म्हणजे सहाच महिन्यापूर्वी या कालव्याचं काम करण्यात आलं होतं. दरम्यान, याबाबत प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास इथले नागरिक आणि गुरं, जनावरांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे.

जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली

गेल्या चोवीस तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला बसला असून खेड तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून तालुक्यातील महत्त्वाच्या अशा जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड-दापोली मार्गावरील मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने खबरदारी म्हणून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली तर जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केल्याने बाजारपेठेतील नागरिकांना आणि सकल भाग परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पेणच्या गणपती मूर्ती कारखान्याला फटका

गेले दोन तीन दिवस मुसळधार पावसाचा फटका मुंबई सह रायगड,  रत्नागिरी सारख्या जिह्यांना बसला. त्याचाचा मोठा फटका पेण मधल्या गणपती मूर्तींच्या  कारखान्याला बसला आहे.  कारखान्यात पुराचे पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गणपती मुर्तींचे नुकसान झालेले दिसत आहेत. गावाजवळ असलेल्या दादर खाडीला पूर आला की ते पाणी गावाच्या हद्दीत शिरते आणि मोठ्या प्रमाणात नुकसानाला ग्रामस्थांना आणि मूर्तीकारांना सामोरे जावे लागते.

इतर बातम्या: 

Mumbai rains: मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून 6 हजार कोटी खर्च, तरीही मुंबई पाण्यात; वाचा सविस्तर

Mumbai Rains: मुंबईत पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमानी वैतागले

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...