AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहिदांच्या कुटुंबीयांचे पाय धुतले, नंतर चांदीच्या ताटात प्रेमाने घास भरवला, बच्चू कडू यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

बच्चू कडू यांनी शहीद जवानांच्या वीरमातांचे पाय धुतले. तसेच बच्चू कडू यांनी चांदीच्या ताटात शहिदांच्या कुटुंबियांना शाही भोजन दिलंय. या अनोख्या पंगतीत बच्चू कडू स्वत:च वाढपीही झाल्याचे पाहायला मिळाले.

शहिदांच्या कुटुंबीयांचे पाय धुतले, नंतर चांदीच्या ताटात प्रेमाने घास भरवला, बच्चू कडू यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन
BACCHU KADU
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 10:02 PM
Share

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला. बच्चू कडू यांनी शहीद जवानांच्या वीरमातांचे पाय धुतले. तसेच बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी चांदीच्या ताटात शहिदांच्या कुटूंबियांना शाही भोजन दिलंय. या अनोख्या पंगतीत बच्चू कडू स्वत:च वाढपीही झाल्याचे पाहायला मिळाले. बच्चू कडू यांनी हॉटेल ग्रीनलँड येथे हा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. (MLA Bacchu Kadu special tribute given food to Martyred Jawans family on occasion of independence day)

शहिदांच्या कुटूंबियांचे पाय धुत केली कृतज्ञता व्यक्त

लढवय्या अन् आक्रमक नेता अशी बच्चू कडू यांची ओळख आहे. पण कडू यांचं एक हळवं अन संवेदनशील रूप आज पहायला मिळालंय. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासून बच्चू कडूंचे शासकीय कार्यक्रम होते. मात्र, दुपारी ग्रीनलँड हॉटेलच्या सभागृहात पालकमंत्री बच्चू कडूं यांच्यातील एक वेगळं रूप पहायला मिळालं. कडू यांनी शहिदांच्या कुटूंबियांचे पाय धुत आपली कृतज्ञता व्यक्त केली.

पाटावर चांदीचं ताट, ताटात पंच-पक्वान

यावेळी अकोला शहरातल्या ग्रीनलँड हॉटेल सभागृहातील वातावरण भावूकतेच्या हळव्या क्षणांनी भारावलं होतं. शहिदांच्या कुटुंबीयांना जेवण्यासाठी पाट तसेच पाटावर चांदीचं ताट, ताटातले पंच-पक्वान अशी मेजवानी करण्यात आली होती. यामध्ये शहिदांच्या कुटुंबीयांना बच्चू कडू आग्रहानं जेवण वाढत होते. जेवणाच्या कार्यक्रमानंतर कडू यांनी विरांच्या माता आणि पित्यांना शाल अन् साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी अशा अनोख्या सन्मानानं शहिदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

बच्चू कडूंनी वैयक्तिक खर्चातून केला कार्यक्रम

ग्रीन्डलँड हॉटेलमधील या कार्यक्रमात एकूण 28 शहिदांच्या कुटुंबियांना बोलविण्यात आलं होते. तर या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च बच्चू कडूंनी त्यांच्या वैयक्तिक खर्चातून केला.

इतर बातम्या :

“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता ?” औरंगाबादच्या नामांतरावरुन इम्तियाज जलील आक्रमक, वाद पुन्हा पेटणार ?

सर्व विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना देणार, ‘देवदूत सन्मान’ कार्यक्रमात उदय सामंतांची घोषणा

UPSC Exam Calendar: यूपीएससीकडून 2022 च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, ‘इथे’ पाहा परीक्षांच्या तारखा

(MLA Bacchu Kadu special tribute given food to Martyred Jawans family on occasion of independence day)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.