नागपूर : राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आणि एकूणच महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ‘प्रहार’ पक्ष इलेक्शन मोडवर आलाय. प्रहारला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालंय. त्यामुळे या मंत्रिपदाचा फायदा पक्ष संघटनेसाठी करुन घेत ‘प्रहार’ची राज्यभर वेगानं सदस्य नोंदणी सुरु झालीय. शिवाय बच्चू कडू यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते ठिकठिकाणी शाखा गठित करत आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूकीत ‘प्रहार’चं मिशन 12 ते 15 आमदार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. यासाठी त्यांनी खास रणनीती देखील आखलीय.