AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आगामी विधानसभा निवडणुकीत ‘प्रहार’चं मिशन 12-15 आमदार, बच्चू कडूंचा नेमका प्लॅन काय?

राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आणि एकूणच महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ‘प्रहार’ पक्ष इलेक्शन मोडवर आलाय. प्रहारला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालंय. त्यामुळे या मंत्रिपदाचा फायदा पक्ष संघटनेसाठी करुन घेत ‘प्रहार’ची राज्यभर वेगानं सदस्य नोंदणी सुरु झालीय.

आगामी विधानसभा निवडणुकीत ‘प्रहार’चं मिशन 12-15 आमदार, बच्चू कडूंचा नेमका प्लॅन काय?
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 6:58 PM
Share

नागपूर : राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आणि एकूणच महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ‘प्रहार’ पक्ष इलेक्शन मोडवर आलाय. प्रहारला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालंय. त्यामुळे या मंत्रिपदाचा फायदा पक्ष संघटनेसाठी करुन घेत ‘प्रहार’ची राज्यभर वेगानं सदस्य नोंदणी सुरु झालीय. शिवाय बच्चू कडू यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते ठिकठिकाणी शाखा गठित करत आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूकीत ‘प्रहार’चं मिशन 12 ते 15 आमदार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. यासाठी त्यांनी खास रणनीती देखील आखलीय.

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, “प्रहार संघटनेच्या वाढीसोबत लोकांचं समाधान होईल, असा आम्हाला विश्वास आहे. म्हणूनच 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी आपण राज्यभर प्रहार संघटनेची सदस्य नोंदणी सुरू केलीय. एका वेगळ्या विचाराने प्रहार संपूर्ण महाराष्ट्रात काम करेल. प्रचंड प्रमाणात लोक संघटनेत सहभागी होत आहेत. आगामी काळात आम्हाला राजकीय अस्तित्व अधिक ताकदीने निर्माण करायचं आहे.”

“आगामी निवडणुकीत प्रहारचे 15-20 आमदार विधानसभेत नेणार”

“आगामी निवडणुकीत प्रहारचे 15-20 आमदार विधानसभेत नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. केवळ आमदारकीसाठी नाही, तर जनसामान्यांचा आवाज म्हणून हे करु. प्रहार आहे म्हणून आपण अपंगांचे 32 शासननिर्णय आपण काढू शकलो. आताचं 1 टक्का आरक्षण देखील याचाच परिणाम आहे. येणाऱ्या काळात भिक मागणाऱ्यांची आम्ही कार्यशाळा घेणार आहोत. शेतकऱ्यापासून या घटकांपर्यंतच्या कामाचा प्रभाव वाढवायचा असेल तर प्रहार संघटनेचा प्रभाव वाढणं महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही यात जास्त लक्ष देतोय,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

“सदस्य नोंदणीतच निवडणुकीची तयारी, पक्षापेक्षा लोकांचे प्रश्न घेऊन लढू”

“सदस्य नोंदणीतच निवडणुकीची तयारी आहे. याच माध्यमातून आम्ही प्रत्येक मतदारसंघात पोहचू. संपूर्ण महाराष्ट्रात नोंदणी होईल. त्यानंतर 10-15 मतदारसंघ आमचं टार्गेट असेल. या मतदारसंघांमध्ये आम्ही मोठ्या ताकदीने प्रयत्न करु,” असंही त्यांनी नमूद केलं. आगामी निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस की भाजपसोबत लढणार असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू यांनी आम्ही लोकांसोबत निवडणूक लढू असं उत्तर दिलं. पक्षापेक्षा आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लढू असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

कट्टरवाद्यांना बच्चू भाऊंचा घरचा आहेर, नाशिकच्या ‘त्या’ हिंदू-मुस्लिम लग्नाला पाठिंबा, धर्माच्या ठेकेदारांना तंबी

VIDEO: चिमुकलीचा घरासाठी थेट बच्चू कडू यांना फोन, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

VIDEO: रुग्णांचं निकृष्ट जेवण पाहून बच्चू कडूंचं रौद्ररुप, सर्वांसमोर आचाऱ्याच्या कानशिलात लगावली

व्हिडीओ पाहा :

Prahar Chief Bachchu Kadu say will win 12-15 seats in Assembly election

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.