AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar | प्रशासनाला कधी येणार जाग…? चरणमाळ घाटात आठ दिवसात तीन अपघात, कांद्याने भरलेला ट्रक पलटी, दोन जण जखमी

चरणमाळ घाटात लुटमारीचे प्रमाण वाढले होते. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावर तातडीने उपाययोजना केल्या. स्थानिक पोलीस अधिकारी बाळासाहेब भापकर यांनी चरणमाळ परिसरातील ग्रामस्थांची बैठका घेऊन ग्राम सुरक्षा दल स्थापन करून लूट थांबवली असली तरी अपघात थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Nandurbar | प्रशासनाला कधी येणार जाग...? चरणमाळ घाटात आठ दिवसात तीन अपघात, कांद्याने भरलेला ट्रक पलटी, दोन जण जखमी
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 12:58 PM
Share

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात सलग दुसऱ्या दिवशी अपघात (Accident) झाल्याची घटना घडलीयं. चरणमाळ घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कांद्याने भरलेला ट्रक सटाण्याहून गुजरातकडे जात असताना चरणमाळ घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसलीतरी चालक आणि सहचालक किरकोळ जखमी झाले आहेत. काल मालेगाव (Injured) सुरत बसचा याचठिकाणी अपघात झाला होता. या अपघातामध्ये वीस प्रवासांना किरकोळ दुखापत झाली होती आणि आज पुन्हा दुसऱ्या दिवशी ट्रक (Truck) घाटात कोसळला आहे. आठवडाभरात हा तिसरा अपघात आहे. मात्र महामार्ग प्रशासन याबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलतांना दिसत नाहीयं.

सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी येणार जाग?

चरणमाळ घाटात दररोज होणाऱ्या अपघाताबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कुठली उपाययोजना करताना दिसून येत नाहीये. जणू काय मृत्यू तांडवाची वाट पाहत आहेत. या घाटात वर्षानुवर्ष अपघात आहेत तर महाराष्ट्र आणि गुजरात होऊन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहन ये-जा करतात. मात्र या ठिकाणी महामार्ग प्रशासनाने कुठलाही दिशादर्शक फलक लावला नाहीयं. इतकेच नाही तर पुलांवर कठाळे देखील लावण्यात आले नाहीयं, यामुळे अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे.

लुटमार थांबवण्यासाठी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केला उपायोजना

चरणमाळ घाटात लुटमारीचे प्रमाण वाढले होते. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावर तातडीने उपाययोजना केल्या. स्थानिक पोलीस अधिकारी बाळासाहेब भापकर यांनी चरणमाळ परिसरातील ग्रामस्थांची बैठका घेऊन ग्राम सुरक्षा दल स्थापन करून लूट थांबवली असली तरी अपघात थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा स्थानिकांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.

सूचना फलक घाटामध्ये लावण्याची मागणी

या ठिकाणी अपघात होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण तीव्र उतार आणि लागलीच मोठे वळण असल्याने नवीन चालकाला घाटाची कल्पना येत नाही आणि अपघात होतात. याठिकाणी घाटाच्या उतारावर एका बाजूला गतिरोधक बसवावे त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित होईल. 40 पेक्षा कमी वेगानेच वाहन घाटात चालवण्याबाबत देखील सूचना फलक लावाले आणि अपघात क्षेत्राचा फलक घाटात लावावेत. अशी मागणी आता जोर धरू लागलीयं.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप