AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब … तू टेन्शनमध्ये पाठवलंस, आंघोळ करता करता थांबलो: नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे विठ्ठल देसाई ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. जेव्हा ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली, तेव्हा देसाईच नव्हे तर खुद्द केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांचीही घालमेल झाली.

चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब ... तू टेन्शनमध्ये पाठवलंस, आंघोळ करता करता थांबलो: नारायण राणे
narayan rane
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 6:23 PM
Share

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे विठ्ठल देसाई ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. जेव्हा ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली, तेव्हा देसाईच नव्हे तर खुद्द केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांचीही घालमेल झाली. खुद्द राणेंनीच त्यांची घालमेल कशी झाली हे सांगितलं. निकाल लागत असताना तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं होतं. आंघोळ करता करता मी थांबलो होतो, असं सांगत नारायण राणे यांनी मनमुराद हसून तणावाला वाट मोकळी करून दिली.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे मुंबईत होते. जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झाल्याची बातमी येताच राणे सिंधुदुर्गाच्या दिशेने गेले. त्यांनी सिंधुदुर्गात येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. यावेळी ईश्वर चिठ्ठीने निवडून आलेले विठ्ठल देसाईही बाजूलाच बसलेले होते. सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यात जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी लढत झाली होती. यावेळी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीने निकाल देण्यात आला. त्यात विठ्ठल देसाई विजयी झाले होते.

राणे नेमकं काय म्हणाले?

तुम्ही (विठ्ठल देसाई) जिंकला खरं वाटतंय… नशीब आहे हां… नशीब आहे… मोठ्ठं नशीब आहे… चिठ्ठीवर येणं म्हणजे मोठ्ठं नशीब. तुम्ही आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं. मी आंघोळ करता करता थांबलो… म्हटलं अरे काय ते…, असं राणे म्हणाले. तेव्हा एकच खसखस पिकली. स्वत: राणेंनीही हा किस्सा सांगताना मनमुराद हसून दाद दिली.

मविआच्या लोकांना जागा दाखवली

यावेळी त्यांनी राजन तेलींच्या पराभवावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजन तेलीची आम्ही वर्णी लावणार. आम्ही वाया जावू देणार नाही. आम्ही मविआच्या लोकांना जागा दाखवली आहे, असं सांगतानाच राजन तेलीचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. तो निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतली तो मान्य असेल. ही काय शिवसेना नाही, असा टोला त्यांनी लगावला.

अजितदादांना टोला

ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते. नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चाललं. माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. कुणाविरोधात? अतिरेक्यांविरोधात? अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात याला अक्कल म्हणतात, असा चिमटा त्यांनी काढला.

संबंधित बातम्या:

Mahadev jankar : काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, महादेव जानकरांचा आरोप

Sindhudurg Bank Election Result | आता टार्गेट महाराष्ट्र सरकार, विजयानंतर नारायण राणेंची सिंधुदुर्गातून डरकाळी

Narayan Rane: आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार, सिंधुदुर्ग बँकेच्या विजयानंतर नारायण राणेंचं सूचक विधान

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.