राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीय राजकारणाला सुरुवात; राज ठाकरे यांचा पुन्हा आरोप

राहुल गांधींना सावरकरांचा विषय काढण्याचा काही संबंध होता का? कोणीही उभं राहतं काहीही बोलतं. त्याला तुम्ही नको ती प्रसिद्धी देत असता.

राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीय राजकारणाला सुरुवात; राज ठाकरे यांचा पुन्हा आरोप
राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीय राजकारणाला सुरुवात; राज ठाकरे यांचा पुन्हा आरोपImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 12:15 PM

सिंधुदुर्ग: राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. मुस्लिम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या. त्यातून फंडिग गोळा करण्यात आलं. 1999 पासून हे विष राज्यात कालवलं गेलं, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.

जातीच्या राजकारणासाठी महाराष्ट्रात या गोष्टी केल्या जात आहेत. जातीच्या राजकारणासाठीच शिवाजी महाराजांचा अवमान केला जात आहे. या आधी लोकं जन्माला आली त्यांना काय इतिहास माहीत नव्हता का? तो आताच जागृत झाला का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

एनसीपीपासून जातीचं राजकारण सुरू झालं. शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाहीत. त्यांची सर्व भाषणं काढून पाहा. व्यासपीठावर शाहू, फुले, आंबेडकर असतात. मी एका मुलाखतीत त्यांना याबाबत विचारलं होतं. त्यावर शाहू, फुले, आंबेडकर हा विचार आहे, असं ते म्हणाले होते. मग शिवाजी महाराज हा विचार नाही का? त्या विचारावरच पुढचा विचार आला ना?, असा सवाल त्यांनी केला.

शिवरायांचं नाव घेतलं तर मुस्लिम मते जातात. त्यामुळे कोणत्या तरी टोळ्या उभ्या केल्या जातात फंडिग गोळा करण्यासाठी. 1999 पासून महाराष्ट्रात हे विष कालवलं गेलं, असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधींना सावरकरांचा विषय काढण्याचा काही संबंध होता का? कोणीही उभं राहतं काहीही बोलतं. त्याला तुम्ही नको ती प्रसिद्धी देत असता. त्यामुळे हे घडतंय, असा आरोपही त्यांनी केला.

सिंधुदुर्गात पक्षात गटबाजी आहे. त्याला चाळण लावणं गरजेचं आहे. संघटनात्मक विस्कळीतपणा दूर करणं गरजेचं होतं. त्यासाठी आलो आहे. पक्षाचे हितचिंतक, महाराष्ट्र सैनिक अशा गोष्टींना कंटाळून घरात बसलेत. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी हा दौरा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.