AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 महिन्यांचं बाळ अखेर सापडलंच नाही, चिमुकलीच्या वडिलांच्या सहमतीनंतर एनडीआरएफने आंबेघरमधील बचाव कार्य थांबवलं

आंबेघर दुर्घटनेतील 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरडीमध्ये एकूण 15 जण दबले गेले होते. यामध्ये एका 10 महिन्याच्या बाळाचादेखील समावेश होता.

9 महिन्यांचं बाळ अखेर सापडलंच नाही, चिमुकलीच्या वडिलांच्या सहमतीनंतर एनडीआरएफने आंबेघरमधील बचाव कार्य थांबवलं
9 महिन्यांचं बाळ अखेर सापडलंच नाही, चिमुकलीच्या वडिलांच्या सहमतीनंतर एनडीआरएफने आंबेघरमधील बचाव कार्य थांबवलं
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 8:27 PM
Share

सातारा : आंबेघर दुर्घटनेतील 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरडीमध्ये एकूण 15 जण दबले गेले होते. यामध्ये एका 10 महिन्याच्या बाळाचादेखील समावेश होता. एनडीआरएफच्या पथकाकडून कालपासून शोध मोहिम सुरु आहे. या शोध मोहिमतून एकूण 14 मृतदेह सापडले. पण अद्यापही दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडलेला नाही. एनडीआरएफच्या पथकाने प्रचंड मेहनत घेतली. पण प्रयत्न करुनही अद्यापही बाळ सापडलं नाही. संध्याकाळ झाल्याने अखेर बाळाच्या वडीलांच्या संमतीने एनडीआरएफने शोध मोहिम थांबवली. संबंधित दहा महिन्याच्या मुलीचं नाव हर्षदा धोंडीराम कोळेकर असं आहे.

नेमकं काय घडलं?

रायगडमधील तळीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली असताना, तसाच प्रकार साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडला. आंबेघर या गावात दरड कोसळून जवळपास 15 लोक ढिगाऱ्याखाली दबले. 23 जुलैला दुपारी हा प्रकार समोर आला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.

आंबेघरमध्ये दुर्घटनेनंतर तब्बल 35 तास उलटल्यानंतरही प्रशासनाची मदत मिळालेली नव्हती. अनेक लोकं मदतीविना होती. घटनेला 35 तास उलटूनही त्यांच्यापर्यंत मदत मिळाली नव्हती. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु होतं. टीव्ही 9 ची टीम तिथे पोहोचली. तिथे गेल्यानंतर प्रशासनाची टीम पोहोचली नसल्याचं समोर आलं. प्रशासन जरी पोहोचलं नसलं तरी स्थानिकांनी बचावकार्य सुरु ठेवलं होतं. लवकरात लवकर मदत पोहोचती आहे, असं उत्तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं होतं. त्यानंतर काल एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

तीन भाऊ आणि त्यांचं कुटुंब दबलं

उत्तम कोळेकर यांचं कुटुंब चिखलात दबलं आहे. उत्तम कोळेकर आणि त्यांच्या तीन भावांचं घर मलब्याखाली दबलं. यामध्ये तीन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि पाहुणे असा समावेश आहे. कोळेकर कुटुंबातील मुली पुणे आणि मुंबईला होत्या, त्या काल पाटणमधून टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींसोबत चालत आंबेघरमध्ये पोहोचल्या.

35 तासांनी दोन म्हशी

आंबेघरमधील एका घराच्या मागे गोटा होता. त्यावर दरड कोसळून दोन म्हशी दबल्या गेल्या. जवळपास 35 तासांनी या दोन म्हशी बाहेर काढल्या. या म्हशी गाळात रुतल्या होत्या. गोठ्याची उरलेली भिंत पाडून या म्हशींना आधी श्वासोश्वासाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर गाळात रुतलेल्या म्हशी गावकऱ्यांनी कशाबशा हलवल्या. यंत्रणा नसल्याने गावकरी हाताने चिखल काढत आहेत.

आंबेघर नेमकं कुठं आहे?

आंबेघर हे पाटण तालुक्यातील गाव आहे. पाटणपासून पुढे मोरगिरी बाजारपेठ आहे, मोरगिरीपासून 10 ते 12 किमी अंतरावर आंबेघर गाव आहे. त्या गावची एक वाडी होती, त्या वाडीत 8 ते 9 घर होती. आंबेघरच्या अगदी पायथ्याशी गुरेघर हे धरण आहे. मोरणा नदीवर हे धरण बांधले आहे. आंबेघर हे अगदी डोंगरावर असणारे गाव आहे, यापूर्वी कधीही अशी घटना या भागात घडली नाही ती यंदा घडली.

टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी चार तास, 6 किमीची पायपीट करत आंबेघरमध्ये पोहोचले. त्यांनीही वार्तांकन करत स्थानिकांना मदत कार्यात हातभार लावला. चार ओढे पार करुन, डोंगर चढून उतरणे, पायवाट आहे, अशी पायपीट दिनकर थोरात यांनी केली.

मोरणा धरणापर्यंत रस्ता होता, तो वाहून गेला. कुठलीच यंत्रणा जाणार नाही अशी परिस्थिती तिथे आहे. यंत्राशिवाय माणसांनीच मदत आणि बचावकार्य करावा लागण्याची स्थिती आंबेघरमध्ये आहे. नेहमीच्या वाटा बंद झाल्या आहेत.

आंबेघर पाडावस्ती आहे. इथे 8 घरं आहेत, त्यापैकी 4 घरं दबली आहेत. 4 घरातील 16 माणसं ढिगाऱ्याखाली दबली. या घरातील 14 लोक आणि त्यांच्या घरी भात लावणीसाठी आलेले दोन पाहुणे असे 16 लोक दबले. यामध्ये उत्तम कोळेकर यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Satara Landslide: साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू   

साताऱ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 2 घटना, देवरुखवाडीवर दरड कोसळली, पाटणच्या आंबेकरमधील काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली 

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.