AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! ठाकरे आणि शिंदे गट पहिल्यांदाच आंदोलनात एकत्र, भाजपचा सहभाग नाही; राज्याच्या राजकारणात काय घडतंय?

राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा ठराव विधानसभेत मांडण्याची गरज नाही, असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे.

मोठी बातमी ! ठाकरे आणि शिंदे गट पहिल्यांदाच आंदोलनात एकत्र, भाजपचा सहभाग नाही; राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 26, 2022 | 10:20 AM
Share

कोल्हापूर: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात विस्तवही जात नाही. दोन्हीकडे नेते रोज एकमेकांवर तुटून पडताना दिसतात. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते एकत्र एकाच मंचावर येण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात होतं. मध्यंतरी कोकणात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गटाचे बडे नेते एकत्र येणार होते. त्यामुळे दोन्ही गटातील दुरावा काहीसा कमी होईल असं वाटत होतं. मात्र, ठाकरे गटाने या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला अन् दोन्ही गटाचे नेते एकाच मंचावर येण्याचा प्रसंग टळला. मात्र, आज दोन्ही गटाचे नेते पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. निमित्त आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन.

महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज कोल्हापुरात धरणे आंदोलन पार पडणार आहे. या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीसह शिंदे गट ही सहभागी होणार आहे. म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिंदे गटही या आंदोलनात सहभागी होऊन कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात भाजप सहभागी होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदाच दोन्ही गटाचे नेते एकत्र येत असून त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं जाणार आहे. कर्नाटक प्रशासनाकडून निवेदन स्वीकारलं जात नसल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापुरात धाव घेतली आहे. कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवण्याची एकीकरण समितीने मागणी केली आहे.

दरम्यान, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा ठराव विधानसभेत मांडण्याची गरज नाही, असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा या आधी ठराव झाला होता. त्यामुळे नव्याने ठराव मांडण्याची गरज नाही, असं खाडे यांचं म्हणणं आहे.

आम्ही सगळे कर्नाटकातील मराठी भाषिकांबरोबर आहोत, त्यामुळे नव्याने ठराव मांडण्याची गरज नाही. कर्नाटकला महाराष्ट्रातील एकही गाव देणार नाही. सांगली जिल्ह्यातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, असं खाडे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?