AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकं तीन गाण्यांचे दीड लाख देतात आणि…; इंदोरीकर महाराज यांनी सुनावलं

कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला. मात्र तीन गाण्याला लोकं दीड लाख रुपये देतात. तीनच गाणे पण शिट्ट्या?. गाडा आला आणि घाटात राडा झाला.

लोकं तीन गाण्यांचे दीड लाख देतात आणि...; इंदोरीकर महाराज यांनी सुनावलं
| Edited By: | Updated on: Mar 27, 2023 | 9:48 AM
Share

बीड : इंदोरीकर महाराज हे कीर्तनकार आहेत. ते त्यांच्या कीर्तनामधून समाजप्रबोधन करतात. पण, टीकाही तशीच करतात. त्यामुळे त्यांचे कीर्तन मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं. परंतु, सध्या गौतमी पाटील हिच्या लावणीच्या कार्यक्रमाला गर्दी असते. त्यासाठी ती एक ते दीड लाख रुपये फीस घेत असल्याचं सांगितलं जातं. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कीर्तनकाराने थोडे जास्त पैसे मागितल्यास लोकं कीर्तनकारांवर टीका करतात. मग, दीड लाख रुपये देऊन लोकं काय करतात, अशी टीका इंदोरीकर महाराज यांनी केली.

बीडनंतर आता शिर्डी येथे कीर्तनादरम्यान इंदोरीकर महाराजांनी नाव न घेता पुन्हा एकदा गौतमी पाटीलवर निशाणा साधलाय. शिर्डी येथे भरलेल्या देशातील सर्वात मोठ्या महापशुधन एक्स्पोच्या समारोपानिमित्ताने काल इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

तीनच गाणे पण शिट्ट्या?

कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला. मात्र तीन गाण्याला लोकं दीड लाख रुपये देतात. तीनच गाणे पण शिट्ट्या?. गाडा आला आणि घाटात राडा झाला. असे म्हणत, थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदोरीकर महाराजांनी उपस्थितांना दिलाय.

आपली संस्कृती टिकवणे गरजेचे

इंदोरीकर महाराज म्हणाले, कीर्तनकाराने पाच हजार रुपये जास्त मागितले तर लोकं म्हणतात, यांनी बाजार मांडला. देवाचा बाजार मांडला. तीन गाण्यांचे लोकं दीड लाख रुपये देतात. तीनच गाणे पण, शिट्या…कार्यक्रमात राडा होतो.

थोडी आपली संस्कृती टिकवणं गरजेचं आहे. या कृषी प्रदर्शनात आपल्याला काही कामं करायची आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे. संस्कृती टीकवायची आहे, असं आवाहन इंदोरीकर महाराज यांनी केलं.

बीडमध्ये केली होती टीका

इंदोरीकर महाराज यांनी यापूर्वी बीड येथे गौतमी पाटीलबद्दल वक्तव्य केलं होतं. कीर्तनकारांनी पाच हजार रुपये मागितले तर आमच्यावर लोकं टीका करतात. तिकडे तीन लाखला तीनच गाणी ऐकतात. आणि ३०० पोरांच्या चड्डा फाटतात. २०० पोरांचे गुडघे फुटतात. मारामाऱ्या झाल्या. शेतकरी तुम्ही बोलायचं नाही. असंही इंदोरीकर महाराज म्हणाले होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.