AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस लांबला तर लांबू दे, पालघरकरांनो निश्तिच राहा! 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

पालघर जिल्हामध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात असायची. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या चांगला पाऊस आणि प्रशासनाने केलेले उत्तम नियोजन यामुळे यंदा नागरिकांना पाणी टंचाईची समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार नाहीये. विशेष म्हणजे फक्त धरणातील पाणीसाठा नव्हेतर विहिर, बंधारे, बोर यांनाही अद्याप पाणी आहे.

पाऊस लांबला तर लांबू दे, पालघरकरांनो निश्तिच राहा! 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक
Image Credit source: dnaindia.com
| Updated on: Jun 06, 2022 | 10:05 AM
Share

मुंबई : जून (June) महिन्याला सुरूवात झाली आहे. मात्र, अद्याप राज्यामध्ये पाऊस आलेला नाहीये. अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे पावसाची वाट बघितली जातेय. परंतू पालघरकरांना पाणी टंचाईचे अजिबात टेन्शन नाही. कारण धरणांमध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा अजून शिल्लक आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये जवळपास 42 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याने नो टेन्शन आहे. प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केले असून यामुळे यंदा पाणी टंचाईची समस्या (Problem) जाणवणार नाही. खास गोष्ट म्हणजे उद्योगांकरिता देखील पुरेसे पाणी असल्यामुळे कपात केली जाणार नसल्याचे देखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वच धरण्यांमध्ये पाणी साठा शिल्लक

पालघर जिल्हामध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात असायची. मात्र, गेल्या वर्षी झालेला चांगला पाऊस आणि प्रशासनाने केलेले उत्तम नियोजन यामुळे यंदा नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार नाहीये. विशेष म्हणजे फक्त धरणातील पाणीसाठा नव्हेतर विहिर, बंधारे, बोर यांनाही अद्याप पाणी आहे. परंतू पाणीसाठा जरी शिल्लक असला तरीही पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासानाकडून केले जात आहे. घामणी आणि कवडास ही जिल्ह्यातील दोन सर्वात मोठी धरणे आहेत. त्या दोन धरणांमध्ये साधारण 78 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे हे सर्वात महत्वाचे.

एमआयडीसीला देखील मिळणार पाणी

घामणी आणि कवडास या धरण्यांचे पाणी वसई, विरार, अणुऊर्जा प्रकल्प, तारापूर एमआयडीसी, अदानी पॉवर यांना दिले जाते. यामुळे नागरिकांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाहीये. प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे नागरिकांना पाणी मिळणार आहे. वांद्री धरणात 57 पाणी साठी शिल्लक आहे तर कुझें धरणामध्ये 62 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्याचा वापर सिंचनाकरिता केला जातो. यामुळे या धरण्यांमध्ये पाणी चांगले शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांनी टेन्शन नसणार आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ